शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यात १५ गावांच्या विहिरी आटल्या; बरडशेवाळा कालवा फुटल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:28 IST

बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या जानेवारीतच सुरू झाली आहे.

ठळक मुद्देहदगाव तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९६० मि़मी़ असताना ४६० मि़मी़ पाऊस झाला़बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या सुरु

हदगाव : बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या जानेवारीतच सुरू झाली आहे. हदगाव तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९६० मि़मी़ असताना ४६० मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे नेहमीचे टँकरयुक्त गावे सोडून नदीकाठावरील गावांनाही पाणीटंचाईने आपल्या पाशात ओढले आहे़  नदी-नाले यावर्षी भरलेच नाहीत़ पडलेला पाऊस शेताबाहेरही निघाला नाही़ त्यामुळे रबी पिकांनाही फटका बसला़ बोंडअळीने कापूस खाल्ला तर सोयाबीनला करप्या रोगाने उद्ध्वस्त केले़ हरभरा व गहू पिकासाठी वातावरण पोषक असतानाही पाण्यामुळे गहू पिकाचा पेरा कमी झाला.

हरभरा पिकाचा पेरा दरवर्षी पेक्षा यावर्षी वाढला़; पण इसापूर धरणात १३ टक्केच पाणी असल्याने रबी पिकांना तीनऐवजी एकच पाणी पाळी करण्यात आली़ पाणी पिकांना मिळण्याऐवजी बरडशेवाळा कालवा फुटल्याने नाल्यामध्येच वाहून गेले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल. कालव्याच्या दुरुस्तीचे काम आता हाती घेण्यात आले, दुरुस्तीही होईल, एक पाणीपाळी पुन्हा मिळेलही, मात्रही पाणीपाळी पिकांसाठी उशिरा ठरणारी आहे. अनेकांचा हरभरा काढणीला आला.

दरम्यान, बरडशेवाळा कालवा परिसरातील गावे पाण्याने व्याकूळ  झाली. कालव्याचे पाणी वाहून गेल्याने परिसरातील बरडशेवाळा, उंचाडा, नेवरी, तालंग, नेवरवाडी,  पळसा, अंबाळा, कोथळा, गोर्लेगाव,  बेलमंडळ, वाटेगाव आदी गावांत आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. या कालव्याला ७ जानेवारी रोजी पाणी सोडले होते़ ते शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी ८-१० दिवस लागत होते़ त्यामुळे या परिसरातील विहिरींना पाणी राहिले असते; पण ८ जानेवारी रोजी कालवा फुटला़ काम करण्यासाठी पाणी बंद केले़ आज १२ दिवस उलटले तरी काम पूर्ण झाले नाही़ त्यामुळे विहिरींनी तळ गाठला़ नदीकाठी असलेले खाजगी बोअरही मुकळ्या टाकीत आहेत़ मनाठा, कनकेवाडी, सावरगाव, वडगाव, चिंचगव्हाण, शिवपुरी या गावाना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा होतो.  या गावांना पाणी देण्यासाठी ज्या विहिरी, बोअरचे खाजगीकरण करण्यात येते. त्या नदीकाठच्या गावचेच पाणी आटल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे टाकले आहे़  कालव्याचे काम आटोपून पाणी सोडल्यास या गावातील पाणीटंचाई समस्या काही प्रमाणात सुटू शकते़ 

कणकेवाडीत भटकंतीहदगाव तालुक्यातील कणकेवाडी येथील पाणीयोजना कुचकामी ठरल्याने मागील पंधरा दिवसांपासून गावात पाणीटंचाई आहे. शिवप्रसादनगरतांडा व वाडी मिळून कणकेवाडी ग्रामपंचायत २००५ मध्ये अस्तित्वात आली. यापूर्वी गावातील बोअर, हातपंपाला मुबलक पाणी होते. मात्र गेल्या चार- पाच वर्षांपासून जून-जुलैपर्यंतही पाणीटंचाई असते. तांडावस्तीचा निधी खर्चून नळयोजना करण्यात आली, मात्र ती कुचकामी ठरली. पाणीटंचाईच्या बैठकीत उपसरपंच प्रकाश राठोड यांनी आ. आष्टीकर यांच्याकडे टँकरची मागणी केली होती, मात्र अद्याप टँकर सुरु झाले नाही. गावकर्‍यांना आता १ कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे.

इसापूर धरणात केवळ १३ टक्के पाणी हरभरा पिकाचा पेरा दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढला.इसापूर धरणात पाणी १३ टक्केच असल्याने रबी पिकांना मिळणार्‍या पाणीपाळ्या तीनऐवजी एकच करण्यात आली.परंतु तीही शेतकर्‍याच्या पिकांना मिळण्याऐवजी बरडशेवाळा कालवा फुटल्याने नाल्यामध्येच सात हजार क्युमेक्स पाणी वाहून गेले. यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले.आता काम झाल्यानंतर एक पाणीपाळी मिळेलही़ परंतु पिकासाठी ही पाणीपाळी उशिरा ठरली.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी