शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:32 IST

नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत मिशन’ : आणखी ११२ कोटींची आवश्यकता

गोविंद सरदेशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये आतापर्यंत जवळपास ९८ लाभार्थ्यांना ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.यामध्ये अर्धापूर तालुक्यासाठी २४ लाख ८४ हजार, भोकर - ३ कोटी ५ लाख २८ हजार, बिलोली तालुक्यासाठी ४ कोटी ३० लाख ८ हजार रूपये, देगलूर तालुका- ८ कोटी ६० लाख २८ हजार, हदगाव तालुका - १५ कोटी २० लाख ४० हजार, हिमायतनगर - ७ कोटी ८५ लाख २८ हजार रूपये, कंधार तालुका - १४ कोटी २५ लाख ४८ हजार, किनवट - १६ कोटी ४५ लाख ४४ हजार रूपये तसेच लोहा तालुक्यात १० कोटी ६० लाख ४४ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे माहूर तालुक्यात ७ कोटी ३२ हजार रूपये, मुखेड - ११ कोटी ४० लाख, नायगाव तालुका - ६ कोटी ६० लाख २४ हजार, उमरी - ६ कोटी ७ लाख ३२ हजार तर नांदेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रूपये असे एकूण जिल्ह्यात ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे शौचालय बांधकामासाठीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.दरम्यान, पायाभूत सर्व्हेक्षणात जिल्हा नुकताच पाणंदमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जि.प. च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता.तालुकानिहाय पूर्ण झालेले शौचालय बांधकामअर्धापूर तालुका- ११ हजार ८१३, भोकर - १८ हजार ३२२, बिलोली - २३ हजार ५५७, देगलूर - २८ हजार ५८६, धर्माबाद - ११ हजार ५८२, हदगाव तालुका- ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट तालुका - ४१ हजार ४३, लोहा - ३६ हजार ६२३, माहूर तालुका - १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव तालुका - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यात १५ हजार ९०५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.आणखी ११२ कोटी निधीची आवश्यकतादरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ९० हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासाठी आणखी अंदाजे ११२ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानfundsनिधी