शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिलोली तालुक्यातील बोळेगावात कॅन्सरचे १० रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:27 IST

येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

ठळक मुद्देगावात भीतीचे वातावरण आरोग्य विभागासमोर मोठे आव्हानआरोग्याधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

सगरोळी : येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.बोळेगाव हे दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे गाव. येथील गावातील सर्वच नागरिकांना मांजरा नदीचे, बोअरवेलचे पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. पाणीपुरवठाही सुरळीत होतो. मात्र गत अनेक वर्षांपासून पाणीनमुने तपासण्या करण्याकडे ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तेलंगणा रॉयल सीमेवरचे गाव असल्याने अनेक नागरिक शिंदी, दारू, विडी, सिगारेट व गुटख्याच्या व्यसनात ओढले गेले आहेत.या गावापासून तीन कि.मी.अंतरावर सगरोळीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर १२ कि.मी.वर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त बिलोली ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालय आहे. गावात दोन अंगणवाड्या असून गरोदर माता, कुपोषित माता व बालके, किशोरवयीन मुलींची तपासणी व आहारविषयी सूचना वेळोवेळी दिल्या जात असल्या तरी यांना कॅन्सर- सारख्या जीवघेण्या रोगाचे रूग्ण आढळले नाहीत. याबाबत या भागात आश्चर्य व्यक्त होत आहे. मांजरा नदीकिनाºयावर वसलेल्या सगरोळी परिसरासह बोळेगावात बºयाच प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे येथील जमीन ओलिताखाली असून या भागात रबी व खरीप हंगामातील पिके व भात (साळ) पिकाबरोबरच भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.फूलकोबी, पानकोबी, गड्डाकोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, दोडके, भेंडी यासह विविध फळभाज्या तसेच पालेभाज्या, बिलोली, सगरोळी, बोधन, नायगाव, कुंडलवाडी, कासराळी, देगलूर आदी आठवडी बाजारात विकल्या जातात. कमी काळात जादा उत्पादन घेण्याबरोबरच कीड लागू नये म्हणून, या भाज्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारले जातात. त्याचा फटका मात्र नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. त्यासाठी या भागातील माती व पाण्यात नेमके कोणते विषारी घटक आहेत. त्याचे प्रमाण किती आहे? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? कोणते कीटकनाशके घातक आहेत हे तपासणे गरजेचे आहे. यावर काही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. बोळेगावातील कॅन्सरचे रुग्ण सध्या बार्शी तर काही मुंबई येथील कॅन्सरसाठी प्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.अलीकडेच मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.असं काही होईल असे वाटलेच नव्हते. सतत जाणवणाºया त्रासामुळे काही चाचण्या बार्शी येथील दवाखान्यात करवून घेतल्या आणि त्यातून कॅन्सरचे दुखणे समोर आले. माझी पत्नी, माझ्या मुलींनी धीर दिला. माझ्या कुटुंबियाच्या प्रेमावर मी कॅन्सरशी लढा देणार आहे - राम शिरगिरे बोळेगाव (बार्शी रूग्णालयात उपचार चालू असलेले रूग्ण.)लवकरात लवकर उपचार सुरू करणे हा एकमेव उपाय आहे आणि आम्ही तेच केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी सध्या मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आम्ही आशावादी आहोत. कॅन्सरविरूद्ध लढा देण्याचा निर्धार केला. या काळात माझे पती मोलमजुरी करून माझ्या आजारावरील उपचाराचा खर्च करीत आहेत -राधाबाई शिवाजी कोंडापल्ले बोळेगाव (टाटा मेमोरियल मुंबई येथे उपचार घेत असलेले रूग्ण.)चार ते पाच महिन्यांपूर्वी सगरोळी येथे एक कॅम्प झाला होता. त्या कॅम्पमध्ये कॅन्सरचे रूग्ण आढळून आले नाहीत. कदाचित कॅन्सर रूग्ण दुसºया ठिकाणी उपचार करीत असतील त्यामुळे असे कॅम्पमध्ये दाखल झाले नाहीत. त्यामुळे या भागात कॅन्सर रूग्ण आहेत किंवा नाहीत हे निश्चित सांगणे कठीण आहे -डॉ. वाडेकर, आरोग्य अधिकारी बिलोली

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यcancerकर्करोग