शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जि.प.त झिरो पेंडेन्सी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:12 IST

प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात.

ठळक मुद्देमहिन्याच्या अखेरीस सादर करावा लागणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात. परंतु जि.प. सारख्या प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत जनतेच्या प्रतिक्रिया फारशा समाधानकारक नाही. कारण यंत्रणाच गतिमान नसल्याने, कामेच वेळेत होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जिल्हा परिषद व अंतर्गत येणाºया प्रशासकीय यंत्रणेत झिरो पेंडेन्सी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेचा थेट संबंध ग्रामीण भागातील नागरिकांशी येतो. नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कामासाठी जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयात यावे लागते. अधिकाºयांकडून संबंधित विषयाची फाईल हाताळण्यात येत नसून विविध कारणे दाखविण्यात येतात. यामुळे प्रलंबित प्रकरणाच्या फाईल्सचा ढिगारा वाढत आहे. जिल्हा परिषदेत हजारांवर फाईल्स प्रलंबित असेल. याचा विकास कामावरही परिणाम होतो. शिवाय जिल्हा परिषदबाबत नागरिकांकडून चांगला संदेश जात नाही. जिल्हा परिषदेची ही प्रतिमा पुसण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘झिरो पेंडेन्सीह्ण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सीईओ डॉ. बलकवडे यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी सर्व प्रमुखांना प्रलंबित फाईल्स मुदतीत निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर सर्व बीडीओ आणि विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहे. यात त्यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणाची माहिती घेऊन त्या निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करण्यात येणार आहे. कर्मचाºयांवर असलेला ताण लक्षात घेता ही मुदत ठरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रकरणही निकाली काढण्याची मुदत निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला सीईओ डॉ. बलकवडे याचा अहवाल घेणार आहे.