शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवटीत जि.प. निवडणुकीची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:45 IST

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र अशात राज्यात सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देआयोगाची तयारी जोरात, फक्त घोषणेची प्रतीक्षा : जिल्हा परिषदेत चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर संकटाचे सावट थांबता थांबत नसल्याचे दिसते आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र अशात राज्यात सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धाकधूक वाढली आहे.राज्यात नागपूरसह पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहे. आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीची प्रक्रिया अडकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीची लोकसंख्या राज्य सरकारकडून मागितली होती. पण राज्य सरकार लोकसंख्येची माहिती अद्यापही देऊ शकले नाही. त्यामुळे २० नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला हिरवी झेंडी दिली आहे. आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. सर्कलची पुनर्रचना व आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. औपचारिकता म्हणून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी आहे. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, अशी सर्वांना अपेक्षा आहे. मात्र सध्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांनी अस्थिर वातावरण निर्माण केले आहे. सरकार कुणाचे आणि कधी बसेल याबाबत कुठलेही स्पष्ट संकेत नाही. अशात राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावली आहे. सत्तेच्या गुंतागुंतीत अख्खे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे निवडणुका होतील की नाही? अशी चर्चा जि.प.मध्ये सुरू झाली आहे. सरकार असल्या नसल्याशी निवडणुकीचा काही संबंध नाहीयासंदर्भात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांचे म्हणणे आहे की, राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या संदर्भात प्रशासकीय प्रक्रियाही सुरूच आहे. न्यायालयीन प्रक्रियेत काही बाबी अडकलेल्या आहे. त्यामुळे वेळ झालेलाच आहे. सरकार असल्या नसल्याशी अथवा राष्ट्रपती राजवट लागली तरी, निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही. सरकारच नसल्यामुळे आचारसंहितेत ढवळाढवळीचा प्रश्नही राहिला नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकPresident Ruleराष्ट्रपती राजवट