शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

झुलेलालच्या भागीदारांना जामीन

By admin | Updated: May 20, 2017 02:53 IST

नारा येथील ३६ कोटी रुपये किमतीची नऊ एकर जमीन हडपल्याप्रकरणी झुलेलाल डेव्हलपर्सच्या

३६ कोटी रुपयांची जमीन हडपल्याचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नारा येथील ३६ कोटी रुपये किमतीची नऊ एकर जमीन हडपल्याप्रकरणी झुलेलाल डेव्हलपर्सच्या दोन आरोपी भागीदारांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने गुरुवारी प्रत्येकी १५ हजाराचा जात मुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या दोन हमीवर सशर्त जामीन मंजूर करून सुटका केली. ओमप्रकाश गोकुलदास बजाज आणि सुखदेव प्रेमचंद भागचंदानी, अशी आरोपींची नावे आहेत. जरीपटका येथील रोशन मिनहलदास जोधानी, टिकमदास निथलदास मोटवानी, ओमप्रकाश गोकुलदास बजाज, सुखदेव प्रेमचंद भागचंदानी आणि प्रकाश दयाल आसुदानी यांनी ५ एप्रिल १९९९ रोजी झुलेलाल डेव्हलपर्स नावाच्या फर्मचे भागीदारपत्र तयार केले होते. या भागीदारांनी कमलेश लक्ष्मणलाल जयस्वाल आणि इतर चार, अशा पाच जणांकडून नारा येथील नऊ एकर जमीन सहा खरेदी खताद्वारे विकत घेतली होती. एप्रिल २००० मध्ये या जमिनीच्या मालकांच्या नातेवाईक उषा लाला जयस्वाल आणि इतरांनी जमीन खरेदीदारांविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने २६ जून २००६ रोजी ‘जैसे थे’चा आदेश दिला होता. प्रकरण न्यायालयात असताना ओमप्रकाश बजाज आणि सुखदेव भागचंदानी यांनी या जमिनीचे सर्व अधिकार जयप्रकाश गोकुलदास बजाज याला ६ डिसेंबर २००५ रोजी आममुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. या आममुख्त्यारपत्राचा गैरवापर करून जयप्रकाश बजाज याने झुलेलालच्या इतर भागीदारांना अंधारात ठेवून ही जमीन स्वत: आणि त्याचा भाऊ सुरेश गोकुलदास बजाज यांना २३ लाख ९४ हजार रुपयात विकल्याचा खोटा व बनावट खरेदीखताचा दस्त तयार करून या दस्ताची नोंद महाल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करून ३६ कोटींची ही जमीन हडपली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी ओमप्रकाश बजाज आणि सुखदेव भागचंदानी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक करून त्यांचा एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्यावतीने अ‍ॅड. कैलाश डोडानी, अ‍ॅड. प्रकाश रामरक्षियानी आणि अ‍ॅड. हितेश खंडवानी यांनी काम पाहिले.