शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

झिंग उतरली, कोर्टात दाखल

By admin | Updated: March 15, 2017 02:20 IST

होळीच्या दिवशी दारूच्या नशेत टुन्न होऊन काही जण हुल्लडबाजी करतात, वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालवितात.

 ड्रंकन ड्राईव्ह प्रकरणातील आरोपींची न्यायालयात गर्दी नागपूर : होळीच्या दिवशी दारूच्या नशेत टुन्न होऊन काही जण हुल्लडबाजी करतात, वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालवितात. त्यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जातो. कित्येक निरपराधांना दारुड्या वाहनचालकांमुळे गंभीर दुखापत होते. अशा वाहनचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आधीच तयारी करून ठेवली होती. कारवाईच्या या जाळयात अनेक मद्यपी अडकले. घरी परतल्यावर जेव्हा मद्याचा कैफ उतरला तेव्हा हातात दंडाची नोटीस होती. हे दंड भरण्यासाठी ड्रंकन ड्राईव्ह प्रकरणातील आरोपींनी मंगळवारी न्यायमंदिर इमारतील तिसऱ्या मजल्यावरील जी. जी. कांबळे यांच्या मोटर वाहन कायद्याच्या विशेष न्यायालयात गर्दी झाली होती. रविवारी १२ मार्चच्या सायंकाळपासून दारुड्या वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली. ती सोमवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. शहरातील विविध भागात अवघ्या २४ तासात ९३८ दारुड्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर, कर्णकर्कश आवाज करून, भोंगे (पुंग्या) फुंकत, आरडाओरड करीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील ५५० आरोपींनाच आपला गुन्हा कबूल करून दंड भरला. परंतु असा दंड भरायला आलेल्या या आरोपींमुळे अचानक गर्दी वाढली व इतर न्यायालयातील कामकाजाला फटका बसून आरोपींना वेळेत पेशीवर उपस्थित होता आले नाही. आरोपींच्या वकिलांना आणि सरकारी वकिलांना वेळेवर आपापल्या न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागली. न्यायालयात दंड भरण्यासाठी रात्री ८ पर्यंत गर्दी होती. मोटर वाहन कायद्याचे केवळ एकच न्यायालय आहे. पूर्वी हे न्यायालय दगडी इमारतीमध्ये होते. त्यानंतर ते सुयोग इमारीमध्ये स्थानांतरित झाले होते. आता सुयोग इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालये स्थानांतरित झाल्याने डिसेंबरपासून मोटर वाहन कायद्याचे हे न्यायालय न्यायमंदिर इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर स्थानांतरित झाले. (प्रतिनिधी) पोलिसांचा उत्तम बंदोबस्त होळीसारखा सण म्हटला की दारूला जिकडेतिकडे उधाण येते. दारूची दुकाने बंद असूनही अनेक जण पूर्वीच व्यवस्था करून ठेवतात. धुळवडीच्या दिवशी सकाळपासूनच दारूच्या नशेत अनेक जण हैदोस घालतात. त्यामुळे हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, खून, अपघाताच्या घटना घडतात. हे सर्व लक्षात घेता यावेळी पोलिसांनी नियोजनपूर्वक बंदोबस्त केला होता. केवळ चौकातच नव्हे तर रस्त्यारस्त्यांवर आणि गल्लीबोळातही पोलीस दिसत होते. पोलिसांची गस्ती वाहने धावताना दिसत होती. कुठे काही घडल्याचे कानावर पडताच आजूबाजूचे पोलीस लगेच धाव घेत होते. अत्यंत चांगला पोलीस बंदोबस्त असल्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उपराजधानीत हिंसक घटना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अपघात वगळता इतर हिंसक घटनांची संख्या कमी झाली.