शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

१५ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेलाही मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 10:25 IST

केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगात काही बदल करण्यात आले आहेत. यातील एक बदल म्हणजे १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायती बरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समितीलाही मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगात काही बदल करण्यात आले आहेत. यातील एक बदल म्हणजे १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायती बरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समितीलाही मिळणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्यात येतो. पूर्वी हा निधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत व पंचायत समितीला वळता करण्यात येत होता. काही निधी जिल्हा परिषदांना सुद्धा मिळत होता. मोदी सरकारने चौदाव्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी थेट ग्रामपंचायतींना दिला. गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या या आधारावर निधी देण्यात आला. गावाच्या विकासासाठी निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्यामुळे ग्रामपंचायती अधिक सक्षम होईल, असा अंदाज सरकारचा होता. परंतु अनेक ग्राम पंचायतींना योग्य उपयोग करता आला नाही. आराखडा तयार करण्यासोबत आवश्यक निविदा प्रक्रिया त्यांना राबविता आली नाही. या निधीच्या उपयोगात घोटाळा झाल्याच्याही अनेक तक्रारी समोर आल्या. नागपूर जिल्ह्यात या निधीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या एलएडी लाईटमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले. याप्रकरणी जवळपास १५० सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी सुरू आहे.पंधराव्या वित्त आयोगात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा निधी मिळणार आहे. यात ग्राम पंचायतींना जवळपास ७० टक्के तर जि.प. व पं.स.ला ३० टक्के निधी मिळणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पूर्वी प्रमाणेच हा निधी जिल्हा परिषदमार्फत ग्रामपंचायतींना वळता होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. निधी खर्च करण्यास ग्राम पंचायतींना आलेल्या अपयशामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अशा बदलत गेल्या वित्त आयोगाच्या शिफारशीअकराव्या वित्त आयोगाकडून मिळालेला १०० टक्के निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात येत होता. त्यानंतरच्या बाराव्या वित्त आयोगाकडून उपलब्ध करण्यात आलेला निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रत्येकी २५ टक्के आणि ग्रामपंचायत ५० टक्के याप्रमाणे वर्ग करण्यात आला. तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेला निधी जिल्हा परिषद १०, पंचायत समिती २० आणि ग्रामपंचायत ७० टक्के प्रमाणे खर्च करण्यात आला. आता चौदाव्या वित्त आयोगाचा निधी १०० टक्के ग्रामपंचायतींना देण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद