शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निधी वाटपावरुन न्यायालयात जाण्याच्या तयारीत; सभागृहाच्या प्रोसिडींगनंतर निर्णय

By गणेश हुड | Updated: March 6, 2024 20:00 IST

दहा ते वीस लोकसंख्येच्या काही गावांना छदामही नाही

नागपूर : शासन निर्णयानुसार प्रस्तावित कामाचा ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय कामांना मंजुरी मिळत नाही. ग्रामसभांचे ठराव नसताना काही गावांना जन सुविधा व नागरी सुविधांचा कोट्यवधीचा निधी देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हयातील दहा ते वीस हजार लोकसंख्येच्या अनेक गावांना छदामही मिळाला नाही. निधी वाटपातील भेदभावामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत असल्याने या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

जिल्हा नियोजन समितीने  कामांची यादी मंजूर करताना  जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रस्तावांना डावलण्यात आले. आमदारांच्या व स्थानिक नेत्यांच्या  सूचनेनुसार  जनसुविधा व नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत केला होता.  शासन निकषानुसार मंजूर नियतव्याच्या दिड पटीचे जिल्हा परिषद सदस्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी नियोजन समितीकडे पाठविण्यात आले होते. परंतु सदस्यांची यादी डावलण्यात आली. नियोजन समितीने दुसऱ्या यादीला मंजुरी दिली. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तांत्रिक मंजुरी न देण्याचे निर्देश अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी दिले. उपाध्यक्ष कुंदा राऊत व महिला बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी शासन निर्णयानुसार निधी वाटप न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.मंजूर नियतव्ययाच्या दिडपटीहून अधिक प्रस्ताव कसे?विकास कामांसाठी मंजूर असलेल्या नियतव्याच्या दिड पट प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या सर्कलमधील कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पाठविला होता. दुसरीकडे आमदार व काही नेत्यांच्या सूचनेवरून नियोजन समितीकडे परस्पर प्रस्ताव पाठिवण्यात आले. आधिच दिडपट रकमेचे प्रस्ताव पाठवले असताना अधिक रकमेचे प्रस्ताव कुठल्या कायद्यानुसार पाठविण्यात आले. असा प्रश्न जि.प.पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.७० टक्के ग्रामपंचायतींचे ठरावच नाहीजनसुविधा  व नागरी सुविधांतील विकास कामांचे प्रस्ताव ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय मंजूर करता येत नाही. परंतु जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या ५० कोटींच्या कामापैकी ७५ टक्के ग्रामपंचायतींनी ठरावच पाठिवलेले नाही. अशा जनसुविधा व नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी कशी देण्यात आली. असा प्रश्न जि.प.अध्यक्ष् मुक्ता कोकडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर