शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कृषी विभागाचे शून्य नियोजन

By admin | Updated: June 26, 2017 02:03 IST

शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते, बियाणे, शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी लगबग वाढली आहे.

खरीप हंगाम तोंडावर : जिल्ह्यातील कृषीचा आढावाच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते, बियाणे, शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी लगबग वाढली आहे. ऐन खरीप हंगामात या सर्वांची उपलब्धता बघणे कृषी विभागाचे काम आहे. परंतु जि.प.च्या कृषी सभापतींकडून कृषीच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकच घेण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षापासून कृषी विभागाच्या झालेल्या दुरावस्थेवर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसा दुर्लक्षितच आहे. या विभागाकडे कोणतेही अधिकार नाही. शासनाच्या कृषी अधीक्षक कार्यालयामार्फतच शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र पिकांची पाहणी, पीक नुकसानीचा आढावा घेणे, नियोजन करणे आदी कामे जि. प. च्या कृषी विभागालाच करावी लागतात. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागासाठी दरवर्षी साधारणत: दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवून वैयक्तिक लाभांच्या योजनासाठी निधीची मागणी करावी लागते. या निधीतून शेतक ऱ्यांना ताडपत्री, मोटार पंप, कॅरेट, पीव्हीपी पाईप आदी साहित्य वाटप केले जाते. परंतु गेल्या वर्षी हे साहित्य वाटपच करण्यात आले नव्हते. कृषी विभागाचा ३९ लाखांचा अखर्चित निधी होता. या निधीतून ५० टक्के अनुदानावर शेतक ऱ्यांना पीक संरक्षणाकरिता टू इन वन डुएल टाईप बॅटरी कम हॅण्ड स्प्रेअर व पॉवर स्प्रे पंप वाटप करण्यात येणार होते. परंतु १६ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या जि. प. च्या बैठकीत हा अखर्चित निधी बांधकाम विभागातील १७ सामूहिक योजनेंतर्गत वळते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय कृषी विभागाचा जवळपास २ कोटींचा निधी अखर्चित असल्याचे बोलले जात आहे. शेतक ऱ्यांना शासनातर्फे बी-बियाणे, खते अनुदानावर उपलब्ध होतात. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला, याचा आढावा घेण्याची जबाबदारी कृषी सभापतींची आहे. परंतु यासंदर्भात त्यांनी आढावाच घेतलेला नसून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा आहे. कृषी विभागाबरोबर पशुसंवर्धन विभागाचीही तीच गत आहे. याला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.