शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

कृषी विभागाचे शून्य नियोजन

By admin | Updated: June 26, 2017 02:03 IST

शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते, बियाणे, शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी लगबग वाढली आहे.

खरीप हंगाम तोंडावर : जिल्ह्यातील कृषीचा आढावाच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते, बियाणे, शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी लगबग वाढली आहे. ऐन खरीप हंगामात या सर्वांची उपलब्धता बघणे कृषी विभागाचे काम आहे. परंतु जि.प.च्या कृषी सभापतींकडून कृषीच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकच घेण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षापासून कृषी विभागाच्या झालेल्या दुरावस्थेवर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसा दुर्लक्षितच आहे. या विभागाकडे कोणतेही अधिकार नाही. शासनाच्या कृषी अधीक्षक कार्यालयामार्फतच शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र पिकांची पाहणी, पीक नुकसानीचा आढावा घेणे, नियोजन करणे आदी कामे जि. प. च्या कृषी विभागालाच करावी लागतात. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी विभागासाठी दरवर्षी साधारणत: दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवून वैयक्तिक लाभांच्या योजनासाठी निधीची मागणी करावी लागते. या निधीतून शेतक ऱ्यांना ताडपत्री, मोटार पंप, कॅरेट, पीव्हीपी पाईप आदी साहित्य वाटप केले जाते. परंतु गेल्या वर्षी हे साहित्य वाटपच करण्यात आले नव्हते. कृषी विभागाचा ३९ लाखांचा अखर्चित निधी होता. या निधीतून ५० टक्के अनुदानावर शेतक ऱ्यांना पीक संरक्षणाकरिता टू इन वन डुएल टाईप बॅटरी कम हॅण्ड स्प्रेअर व पॉवर स्प्रे पंप वाटप करण्यात येणार होते. परंतु १६ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या जि. प. च्या बैठकीत हा अखर्चित निधी बांधकाम विभागातील १७ सामूहिक योजनेंतर्गत वळते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय कृषी विभागाचा जवळपास २ कोटींचा निधी अखर्चित असल्याचे बोलले जात आहे. शेतक ऱ्यांना शासनातर्फे बी-बियाणे, खते अनुदानावर उपलब्ध होतात. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला, याचा आढावा घेण्याची जबाबदारी कृषी सभापतींची आहे. परंतु यासंदर्भात त्यांनी आढावाच घेतलेला नसून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा आहे. कृषी विभागाबरोबर पशुसंवर्धन विभागाचीही तीच गत आहे. याला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.