शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा गृहपाल जेरबंद

By admin | Updated: December 16, 2015 03:17 IST

वसतिगृहात मेस चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सचिवास ५० हजारांची लाच मागणाऱ्या लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले.

५० हजारांची लाच स्वीकारली : एसीबीने बांधल्या मुसक्या नागपूर : वसतिगृहात मेस चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सचिवास ५० हजारांची लाच मागणाऱ्या लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले. कैलास अरुण उईके (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो कळमन्यातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गृहपाल(वॉर्डन) म्हणून कार्यरत आहे. त्याला एसीबीच्या कोठडीत पोहचविणाऱ्या महिलेचे नाव अपेक्षा उपरे असून, त्या महिला बचत गटाच्या सचिव आहेत. हा बचत गट आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मेस चालवितो. त्याबाबतचे सप्टेंबर, आॅक्टोबरचे २०१५ च्या चार बिलांची रक्कम वसतिगृहाकडे थकीत होती. त्यातील तीन बिले आरोपी उईकेने काढून दिली. चौथे बिल रोखत त्याने ५० हजारांची लाच मागितली. एकमुस्त ५० हजारांची लाच दिल्याशिवाय चौथे बिल काढून देणार नाही, अशी अडेलतट्टू भूमिका उईकेने घेतली होती. त्यामुळे उपरे यांनी एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेतली. त्यांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपी उईकेच्या मुसक्या बांधण्यासाठी सापळा लावला. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास लाचेची ५० हजारांची रक्कम घेऊन उपरे वसतिगृहात गेल्या. बाजूला एसीबीचे पथक दबा धरून बसले. आरोपी उईकेने लाच स्वीकारताच पोलीस निरीक्षक युवराज पत्की, हवालदार दिलीप जाधव, शंकर कांबळे, महिला शिपाई कोमल गुजर यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी)