सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़ ज्यांना विश्वास असतो आपल्या कर्तृत्वावर अन् ज्यांच्यात धमक असते जग बदलण्याची ते घालतात घाव अंधारलेल्या रात्रीच्या माथ्यावर आणि ओढून आणतात यशाची मंजुळ पहाट. प्रतिकूलतेच्या चक्रव्यूहातूनही शिक्षणाचा मंगलकलश खेचून आणणाऱ्या या विद्यार्थ्यांचेही असेच आहे़...‘आॅस्टिजेनेसिस’ नावाचा दुर्धर आजार असतानादेखील यशाचे शिखर गाठून ९६.८० टक्के मिळवून देवयानी श्रीराम धोंड हिने आदर्श निर्माण केला.पंडित बच्छराज शाळेच्या देवयानीचा दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास संघर्षांनी भरलेला राहिला आहे.संघर्ष असो, वेदना असो किंवा हताशा...सर्वांवर त्याचा दृढनिश्चय पुरून उरला अन् दहावीत ९४.८० टक्के मिळवित अथर्व उदापुरे याने कर्तृत्व सिद्ध करून दिखविले. हात निष्क्रिय असतानादेखील कुठलाही लेखनिक न घेता अवघ्या दोन बोटांच्या मदतीने दहावीची लढाई त्याने जिंकली.वडिलांचा रिक्षा चालेल तोवर घर चालेल. घरची एकूणच परिस्थिती हलाखीची. पण अशाही परिस्थितीत तो खचला नाही. महापालिकेच्या संजयनगर हिंदी प्राथमिक शाळेत शिकणारा कमल विसराम साहू याने दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळवीत महापालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.वडिलांचा रिक्षा चालेल तोवर घर चालेल. घरची एकूणच परिस्थिती हलाखीची. पण अशाही परिस्थितीत तो खचला नाही. महापालिकेच्या संजयनगर हिंदी प्राथमिक शाळेत शिकणारा कमल विसराम साहू याने दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळवीत महापालिकेच्या शाळांमधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कुठलाही तणाव न घेता अगदी मनमोकळेपणे अभ्यास करून सृष्टी वसंत ढोबळे या विद्यार्थिनीने ९८ टक्के गुण प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे ती मागासवर्गीयांमधून विभागातून प्रथम आली आहे.
झेप यशाची...जिद्दीच्या संघर्षाची...
By admin | Updated: June 9, 2015 02:47 IST