शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील युवांना सैन्यात सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:18 IST

भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर.एम. नेगी यांनी पत्रकार परिषदेतून केले.

ठळक मुद्दे२३ आॅक्टोबरपासून सैन्याता भरतीला सुरुवात : कर्नल आर.एम. नेगी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर.एम. नेगी यांनी पत्रकार परिषदेतून केले.नागपूर मुख्यालयातर्फे दरवर्षी सेनेत भरती होऊन देशाची सेवा करण्याची संधी युवकांना दिली जाते. यावेळी सेनेने ही भरती प्रक्रिया अमरावती जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू क्रीडा स्टेडियम येथे आयोजित केली आहे. २३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. कर्नल नेगी म्हणाले की, भारतीय सेनेत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. विदर्भातील युवकांनीसुद्धा यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. बुलडाणा सोडून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील युवक यात सहभागी होऊ शकतात. सात कॅटेगरीसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. साडेसतरा वयोगटाच्या वरील युवकांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. युवकांनी दलाल अथवा अन्य कुणाचे सहकार्य घेऊ नये. किमान १० टप्प्यात भरती प्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी भरती प्रक्रियेत ४० ते ४५ हजार युवक सहभागी झाले होते. यावर्षीही त्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नेगी यांनी व्यक्त केली. यावेळी डिफेन्स पीआरओ ग्रुप कॅप्टन बी.बी. पांडे उपस्थित होते. २४ आॅगस्टपासून आॅनलाईन नोंदणीसेना भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २४ आॅगस्टपासून युवकांना वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करायचे आहे. यात पदनिहाय शैक्षणिक गुणवत्ता, वयाची मर्यादा व आवश्यक कागदपत्राची माहिती मिळणार आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणार आहे.नशेचे पदार्थ सेवन करू नयेदेशात झालेल्या काही भरती प्रक्रियेत युवकांनी शारीरिक चाचणीत क्षमता वाढविण्यासाठी युवक मादक पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेपूर्वी युवकांची चाचणी होणार आहे. यात युवक आढळल्यास त्याला भरती प्रक्रियेच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी मादक पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहनही नेगी यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर