शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये सैनिक भरतीची ‘क्रेझ’

By admin | Updated: September 22, 2015 04:26 IST

एकीकडे आर्मीमध्ये जाण्यासाठी तरुणांमध्ये अनिच्छा असल्याचे बोलले जाते. मात्र ११८ इन्फन्ट्री बटालियनच्या

नागपूर : एकीकडे आर्मीमध्ये जाण्यासाठी तरुणांमध्ये अनिच्छा असल्याचे बोलले जाते. मात्र ११८ इन्फन्ट्री बटालियनच्या नागपूर बेसमध्ये रविवारपासून सुरू झालेल्या सैन्य भरतीसाठी देशभरातून आलेल्या तरुणांचा ओढा पाहता या बोलण्यामध्ये विरोधाभास दिसून येतो. यातील बहुतेकांचा प्रश्न हा रोजगाराशी संबंधित असला तरी, अनेकांनी आर्मीबाबत असलेले आकर्षण आणि देशसेवेसाठी आर्मी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलून दाखविले.भरतीच्या पहिल्या दिवशी उमेदवारांची कागदपत्रे तपासून रनिंगवर भर देण्यात आला. यातून निवड झालेल्या उमेदवारांची फिजिकल, मेडिकल, मौखिक आणि इतर चाचण्या घेऊन अंतिम निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. सैनिक पदासह, मोची, परीट, कुक, हाऊसकिपींग या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, हरियाणा, बिहार अशा राज्यातून हा हा म्हणता १० हजाराच्या वर तरुण भरतीत सहभागी झाले. भरतीची शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे, मात्र १२ वीच नाही, तर कला, वाणिज्य व विज्ञान पदवीधरासह पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थीही यात सहभागी झाले. धावल्यानंतर घामाघूम होऊन बाहेर आलेल्या तरुणांशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला असता, अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. यातील अनेकांच्या प्रतिक्रिया गंभीर विचार करायला लावणाऱ्या आहेत.(प्रतिनिधी)अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे सैनिकी स्वप्न४ठाण्याहून आलेला स्वप्नील पाटील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. १२ वी नंतर वयाच्या अटीमुळे डिफेन्सच्या परीक्षेला बसू शकला नाही. मात्र सैन्यात जाण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. यामुळेच त्याने आतापर्यंत अनेकदा सैन्य भरतीत सहभाग घेतला. त्याच्या सोबतच आलेला चेतन शिंदे हा मिलींग मशिनचे पार्ट्स बनविण्याचे वर्कशाप चालवितो. मात्र सैन्यात जाण्यासाठी त्यानेही इच्छा दर्शविली. १२ वी चा समर पस्टे व बीए झालेला सागर पस्टे या बंधूनीही सैन्यात जाण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न चालविले आहेत. सैनिक म्हणजे प्रतिष्ठा४राजस्थानमध्ये सरकारी नोकरी असणाऱ्याला चांगली प्रतिष्ठा आहे, मात्र सैन्यात असलेल्यांना अधिक मान मिळत असल्याचे शिक्षक ट्रेनिंग करणाऱ्या अजय कुमार याच्यासह संजय गुजर, श्रीचंद सिध्द, संतोष कुमार व इतरांनी सांगितले. सरकारी नोकरी किंवा सैन्यात असलेल्यांना लग्नासाठी मुलींच्या घरच्यांकडून अधिक मागणी असल्याचेही अनेकांनी सांगितले.काहींना हवा आहे अनुभव४बीकॉम करीत असलेल्या राजस्थानच्या राम यादवला दिल्ली पोलिसांत जायचे आहे व त्यासाठी तो सिव्हील सर्व्हिसेसची तयारी करीत आहे. त्यामुळे सैन्य भरतीचे ट्रेनिंग कसे होते, ते अनुभवण्यासाठी तो या भरतीत सहभागी झाला. त्याच्यासारख्याच अनेकांनी हा अनुभव घेण्यासाठी सहभाग घेतला.बेरोजगारीचा प्रश्न गंभीर४सैन्य भरतीत येणाऱ्यांमध्ये बहुतेकांची समस्या ही रोजगाराचीच होती. सैन्यातच नाही, तर रोजगारासाठी कोणतीही नोकरी करण्यास तयार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. वर्धा जिल्ह्यातील पदवीनंतर पीजीडीसीसीएचा डिप्लोमा करणारा संदीप कावळे याने बेरोजगारीची व्यथा सांगितली. राजस्थानचा एमए करणारा लोकेंद्र सिंग याने नोकरीसाठी कोणत्याही राज्यातील भरतीत जाण्यास तयार असल्याचे सांगितले. अशा असंख्य तरुणांनी बेरोजगारीच मुख्य समस्या असल्याचे सांगितले. थोड्या जागांसाठी हजारो युवकांचे दाखल होणे, बेरोजगारीचेच प्रतीक असल्याचे नाकारता येत नाही.देशसेवेचा सर्वोत्तम पर्याय४सीमेवर राहून देशासाठी बलिदान करणारे सैनिक आजही देशसेवेचे आदर्श असल्याचे अनेकांच्या बोलण्यावरून लक्षात येते. पॉलिटेक्निक करणारा अमरावतीचा आशिष दरणे, डीफार्म करणारा आकाश चौधरी आणि आतापर्यंत २० वेळा सैन्य भरतीत सहभागी झालेला वर्ध्याचा चंदू भुंबर यांनी तर देशासाठी काहीतरी करण्यासाठी सैन्यात जाणे हेच अंतिम लक्ष्य ठरविले आहे. राजस्थानचा वसीम सज्जाद, बाबुलाल कुमावत(बीएससी), संजय कुमावत, रामअवतार ही यातीलच नावे आहेत. व्यवस्थेवर अनेकांची नाराजी४सैन्य भरतीसाठी नागपुरात हजारो तरुणांनी हजेरी लावली. मात्र देशभरातून आलेल्या या युवकांसाठी सोयींचा अभाव होता. भरतीसाठी आलेल्या हजारोना कस्तूरचंद पार्क मैदान किंवा फुटपाथवर रात्र काढावी लागली. सुदैवाने पाऊस आला नाही, मात्र तशी शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या युवकांनी कुठे आसरा घ्यावा याची कोणतीही व्यवस्था नाही. या युवकांना भोजनाच्या अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. काहींनी भरती प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली.