शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज

By admin | Updated: July 21, 2014 00:56 IST

सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे.

नागपूर : सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे. त्यामुळे आजच्या तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत आणि भीम पत्रिका जालंधर (पंजाब)चे संपादक एल.आर. बाली यांनी केले. बाली यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मंगल मंडप सभागृह कडबी चौक येथे नागपूरकरांतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समता सैनिक हरीश चहांदे होते. प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे,ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम, डॉ. कृष्णा कांबळे प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी एल.आर. बाली यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ‘आंबेडकरी आंदोलन के समतारत्न एल.आर. बाली’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यावेळी बाली यांचा सत्कार केला. गेल्या कित्येक वर्षानंतर नागपूरकरांशी संवाद साधताना बाली म्हणाले, नागपूर हे देशातील सर्व आंदोलनाचे केंद्र आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मप्रवर्तनासाठी नागपूर शहराची निवड केली होती. सध्या देशात उलथापालथ होत आहे. वैचारिक आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी म्हणणे आणि आंबेडकरी होणे यात मोठी तफावत आहे, नैतिक असणे, तर्कशील असणे आणि मेहनती असणे खऱ्या बुद्धिवंतांचे लक्षण आहे, असे सांगत येत्या काळात देशात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. ती एक लढाई राहणार असून त्यासाठी आंबेडकरवाद्यांनी तयार राहण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. भाऊ लोखंडे यांनी संविधान टोपलीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. समाज एकजूट राहिला तर कुणीही वाईट नजर टाकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. रणजित मेश्राम यांनी बाली यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. कृष्णा कांबळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत समता सैनिक दल मजबूत होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. सचिन कांबळे यांनी संचालन केले. प्रवीण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)