शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज

By admin | Updated: July 21, 2014 00:56 IST

सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे.

नागपूर : सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे. त्यामुळे आजच्या तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत आणि भीम पत्रिका जालंधर (पंजाब)चे संपादक एल.आर. बाली यांनी केले. बाली यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मंगल मंडप सभागृह कडबी चौक येथे नागपूरकरांतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समता सैनिक हरीश चहांदे होते. प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे,ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम, डॉ. कृष्णा कांबळे प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी एल.आर. बाली यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ‘आंबेडकरी आंदोलन के समतारत्न एल.आर. बाली’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यावेळी बाली यांचा सत्कार केला. गेल्या कित्येक वर्षानंतर नागपूरकरांशी संवाद साधताना बाली म्हणाले, नागपूर हे देशातील सर्व आंदोलनाचे केंद्र आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मप्रवर्तनासाठी नागपूर शहराची निवड केली होती. सध्या देशात उलथापालथ होत आहे. वैचारिक आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी म्हणणे आणि आंबेडकरी होणे यात मोठी तफावत आहे, नैतिक असणे, तर्कशील असणे आणि मेहनती असणे खऱ्या बुद्धिवंतांचे लक्षण आहे, असे सांगत येत्या काळात देशात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. ती एक लढाई राहणार असून त्यासाठी आंबेडकरवाद्यांनी तयार राहण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. भाऊ लोखंडे यांनी संविधान टोपलीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. समाज एकजूट राहिला तर कुणीही वाईट नजर टाकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. रणजित मेश्राम यांनी बाली यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. कृष्णा कांबळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत समता सैनिक दल मजबूत होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. सचिन कांबळे यांनी संचालन केले. प्रवीण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)