शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:01 IST

तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर श्रामणेर शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले. 

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने वाट थाई सिरीराजगीर, नालंदा यांच्यावतीने विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती व सूजाता बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १८ मे दरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा ससमारोप शनिवारी दीक्षाभूमीच्या परिसरात सायंकाळी झाला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.व्यासपीठावर थायलंड येथील फ्रा सरीत काय, फ्रा आर्यमिता, भदन्त विरीयज्योती, भदन्त नागघोष, भदन्त नागवंश, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.अष्टांगिक मार्ग हा मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितकी या मार्गाने वाटचाल करील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल, असे मार्गदर्शन भदन्त नागघोष यांनी केले. भदन्त नागवंश म्हणाले,बौद्ध धम्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.संचालन निर्वाण शिंदे यांनी केले तर आभार शरद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशांत ढेंगरे, इंद्रपाल वाघमारे, निर्वाण शिंदे, विलास गजघाटे, शरद मेश्राम, विशाल कांबळे, यशवंत चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. दरम्याण श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्यांनी दीक्षाभूमीच्या परिसरात मेणबत्ती हातात घेऊन बुद्धं, सरणं, गच्छामीच्या निनादात रॅली काढली.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी