शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:01 IST

तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर श्रामणेर शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले. 

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने वाट थाई सिरीराजगीर, नालंदा यांच्यावतीने विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती व सूजाता बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १८ मे दरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा ससमारोप शनिवारी दीक्षाभूमीच्या परिसरात सायंकाळी झाला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.व्यासपीठावर थायलंड येथील फ्रा सरीत काय, फ्रा आर्यमिता, भदन्त विरीयज्योती, भदन्त नागघोष, भदन्त नागवंश, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.अष्टांगिक मार्ग हा मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितकी या मार्गाने वाटचाल करील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल, असे मार्गदर्शन भदन्त नागघोष यांनी केले. भदन्त नागवंश म्हणाले,बौद्ध धम्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.संचालन निर्वाण शिंदे यांनी केले तर आभार शरद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशांत ढेंगरे, इंद्रपाल वाघमारे, निर्वाण शिंदे, विलास गजघाटे, शरद मेश्राम, विशाल कांबळे, यशवंत चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. दरम्याण श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्यांनी दीक्षाभूमीच्या परिसरात मेणबत्ती हातात घेऊन बुद्धं, सरणं, गच्छामीच्या निनादात रॅली काढली.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी