शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युथ एम्पॉवरमेंट समिट : दोन दिवसात १५ हजारावर मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:51 IST

फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी ७१० जणांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. अशाप्रकारे दोन दिवसात विविध कंपन्यांनी १५ हजारावर मुलाखती घेतल्या. यातून १४८६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसात ३३९ जणांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.शनिवारी तब्बल ९,५०० तरुण-तरुणी समिटमध्ये सहभागी झाले होत्या. यापैकी पाच हजारावर लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी ७१० जणांची विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. ४१ कंपन्यांचे ८० एच.आर. यांनी मुलाखती घेतल्या. दोन दिवसात १५ हजारावर मुलाखती पार पडल्या आहेत. कंपन्यांना ज्या उमेदवारांची तातडीची गरज आहे आणि ज्यांनी मुलाखत योग्यपणे यशस्वी केली आणि सर्व कागदपत्र सादर केले त्यांना लगेच नियुक्तीपत्र दिले जात आहे. तर ज्यांचे सिलेक्शन झाले पण काही कागदपत्र सादर झालेले नाही. तसेच कंपनीच्या नियमानुसार त्यांना थेट कंपनीत गेल्यावर जॉईंन करण्यात येणार आहे. जॉईंन करून घेण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला १० ते १५ दिवसांचा पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे.मुलाखतीसोबतच विविध मार्गदर्शनपर सत्रही पार पडले. पहिले मार्गदर्शनपर सत्र पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी पर्यावरण संवर्धन क्षेत्रात रोजगार आणि संबंधित क्षेत्रातील संधी याविषयी विस्तृत माहिती दिली. पॅरिस करारात भारत सहभागी झाल्यापासून, पर्यावरण संवर्धन ही भारत सरकारची प्रमुख मोहीम झाली असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या क्षेत्रात स्वयंरोजगारासह केंद्र तथा राज्य पातळीवरील प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर कॉपोर्रेट कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राचा विस्तार मोठा असून, या संधींचा अभ्यास करून लाभ घेण्याचे आवाहन चॅटर्जी यांनी उपस्थित युवकांना केले.याशिवाय, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी या विषयावर आशिष कोले यांनी तर विमा क्षेत्रातील संधींविषयी आयुर्विमा निगम अर्थात एलआयसीचे विकास अधिकारी अभिषेक शुक्ला यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आमदार अनिल सोले यांच्यासह इतर पदाधिकारी विशेषत्वाने उपस्थित होते.थेट नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारही भारावलेयुथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये तरुणांचा मोठा उत्साह दिसून येतो. हजारो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. प्रत्येक दिवशी उमेदवारांना एसएमएस करून बोलावले जात आहे. दोन दिवसात १५ हजारावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अनेक उमेदवारांचे सिलेक्शन झाले. कालच ऑनलाईन अर्ज केला. आज मुलाखत झाली आणि लगेच नियुक्तीपत्रही मिळाल्याने उमेदवारही भारावले होते. सिलेक्शन झालेल्या काही उमेदवारांशी लोकमतने यावेळी संवादही साधला. यात कमल येंडे हा तरुण गोंदियाचा रहिवासी आहे. त्याने पॉलिटेक्निक डिप्लोमा केला आहे. पुण्यातील फोर्ज कंपनीत त्याचे सिलेक्शन झाले. त्याला लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याने तो भारावला होता. कालच अर्ज केला. आज मुलाखत झाली आणि लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याबद्दल त्याने आश्चर्यही व्यक्त केले. याचप्रकारे वर्धा येथील शिवानी श्याम चांभारे हिने बीई केले आहे. तिची पुण्यातील बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीत निवड झाली. वर्धा येथीलच आफरीन नाझ अली हिचीसुद्धा बीव्हीजी इंडिया लि. कंपनीत निवड झाली. तिला वडील नाही. आई हाऊसवाईफ आहे. मोठी बहीण शिक्षिका आहे.एक नव्हे तीन-तीन कंपन्यांमध्ये सिलेक्शनया समिटमध्ये एका उमेदवाराला एक नव्हे तर पाच विविध कंपन्यांसाठी मुलाखती देण्याची संधी होती. यातील अनेकांचे एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले. नागपूरच्या अनघा महाकाळकर आणि प्रचिता उपाते या तरुणींची एक नव्हे तर तीन-तीन कंपन्यांमध्ये निवड झाली. दोन्ही तरुणींनी बी.ई. (टेलि कम्युनिकेशन) केले आहे. या दोघोंचीही बीव्हीजी, जेबील आणि वरॉक या पुण्यातील कंपन्यांमध्ये निवड झाली. इतकेच नव्हे तर त्यांना सिलेक्शन लेटरही प्रदान करण्यात आले.आज समारोपया युथ एम्पॉवरमेंट समिटचा उद्या रविवारी समारोप होणार आहे. शेवटच्या दिवशीही जवळपास १० हजार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीjobनोकरी