शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भिवंडीच्या तरुणांनी युवतीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:13 IST

नागपूर : भिवंडीच्या दोन तरुणांनी शांतिनगरातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. सोमवारी रात्री याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा ...

नागपूर : भिवंडीच्या दोन तरुणांनी शांतिनगरातील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. सोमवारी रात्री याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

आसिफ अन्सारी आणि मस्तान अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मूळचे भिवंडी, मुंबईचे रहिवासी आहेत. दोन वर्षापासून ते नागपुरात शिवशक्तीनगरात राहत होते. प्लम्बिंगचे काम करणाऱ्या आसिफ आणि मस्तानची रूम जेथे होती तेथे बेपत्ता मुलीचे नातेवाईक राहायचे. त्यामुळे तिचे तेथे जाणे-येणे होते. यातून आरोपींची तिच्यासोबत ओळख झाली. या पार्श्वभूमीवर, बाजारात जाते, असे सांगून सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलगी घराबाहेर पडली. आरोपी आसिफ आणि मस्तान तिला भेटले. ५ वाजेपर्यंत ते इकडेतिकडे फिरत होते. त्यानंतर तवेरा गाडीतून ते नागपुरातून निघून गेले. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी शोधाशोध केली. रात्री १० वाजता ते यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहायक पोलीस उपनिरीक्षक मुस्ताक शेख यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या रूमची तपासणी केली. यावेळी मिळालेल्या माहितीतून ते भिवंडीकडे पळून गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांचे एक पथक आरोपींना शोधण्यासाठी लवकरच भिवंडीकडे रवाना होणार आहे.

---