शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तुझेच धम्मचक्र हे, फिरे जगावरी

By admin | Updated: October 15, 2015 03:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या जगात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या जगात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. १४ आॅक्टोबर १९५६ ही ती ऐतिहासिक तारीख होती. त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ५९ व्या वर्षानिमित्त बुधवारी दीक्षाभूमी बौद्ध अनुयायांनी फुलली होती. हजारो बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. बुधवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी करायला सुरुवात केली होती.दरवर्षी १४ तारखेला दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु यंदा ही संख्या अधिक होती. अनुयायांची गर्दी लक्षात घेता स्मारक समितीला पहिल्यांदाच मध्यवर्ती स्मारकाचे चारही दरवाजे उघडावे लागले होते. बौद्ध-आंबेडकरी अनुयायांनी एका रांगेने जाऊन स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करीत होते. दीक्षाभूमीवर लोकांची ये-जा रात्रीपर्यंत सुरूच होती. (प्रतिनिधी)लोकजागृतीची परंपरा कायम दीक्षाभूमी ही ऊर्जामभूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध-आंबेडकरी अनुयायांना जागृत करण्याच्या दृष्टीने अनेक जण आपापल्या पद्धतीने येथे येऊन जागृतीचे काम करीत असतात. दरवर्षीची ही परंपरा आजही कायम आहे. बुधवारीसुद्धा त्याचा प्रत्यय आला. कुणी आपल्या नाटकांद्वारे, तर कुणी गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचा महिमा सादर करीत जनजागृतीचे काम करीत होते. नागलोकप्रणित समता महिला फाऊंडेशनतर्फे शारदा सोनडवले, हेमलता नंदेश्वर, ज्योती मेश्राम आदींनी पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचा महिमा सादर केला. २२ आॅक्टोबरला मुख्य सोहळा दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री हे मुख्य पाहुणे म्हणून निश्चित झाले आहेत. तत्पूर्वी १७ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या नवनिर्मित वातानुकूलित सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एनसीसी व एसएसडीने सांभाळली व्यवस्था दीक्षाभूमीवर लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) व समता सैनिक दल (एसएसडी)च्या स्वयंसेवकांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सहकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांनी योग्यरीत्या आपली जबाबदारी पार पाडली.