शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तुझेच धम्मचक्र हे, फिरे जगावरी

By admin | Updated: October 15, 2015 03:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या जगात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या जगात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. १४ आॅक्टोबर १९५६ ही ती ऐतिहासिक तारीख होती. त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या ५९ व्या वर्षानिमित्त बुधवारी दीक्षाभूमी बौद्ध अनुयायांनी फुलली होती. हजारो बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. बुधवारी सकाळपासूनच बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी करायला सुरुवात केली होती.दरवर्षी १४ तारखेला दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु यंदा ही संख्या अधिक होती. अनुयायांची गर्दी लक्षात घेता स्मारक समितीला पहिल्यांदाच मध्यवर्ती स्मारकाचे चारही दरवाजे उघडावे लागले होते. बौद्ध-आंबेडकरी अनुयायांनी एका रांगेने जाऊन स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करीत होते. दीक्षाभूमीवर लोकांची ये-जा रात्रीपर्यंत सुरूच होती. (प्रतिनिधी)लोकजागृतीची परंपरा कायम दीक्षाभूमी ही ऊर्जामभूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध-आंबेडकरी अनुयायांना जागृत करण्याच्या दृष्टीने अनेक जण आपापल्या पद्धतीने येथे येऊन जागृतीचे काम करीत असतात. दरवर्षीची ही परंपरा आजही कायम आहे. बुधवारीसुद्धा त्याचा प्रत्यय आला. कुणी आपल्या नाटकांद्वारे, तर कुणी गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचा महिमा सादर करीत जनजागृतीचे काम करीत होते. नागलोकप्रणित समता महिला फाऊंडेशनतर्फे शारदा सोनडवले, हेमलता नंदेश्वर, ज्योती मेश्राम आदींनी पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीचा महिमा सादर केला. २२ आॅक्टोबरला मुख्य सोहळा दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री हे मुख्य पाहुणे म्हणून निश्चित झाले आहेत. तत्पूर्वी १७ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या नवनिर्मित वातानुकूलित सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एनसीसी व एसएसडीने सांभाळली व्यवस्था दीक्षाभूमीवर लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) व समता सैनिक दल (एसएसडी)च्या स्वयंसेवकांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सहकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांनी योग्यरीत्या आपली जबाबदारी पार पाडली.