शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तुमचे रेस्टॉरंट, फूड स्टॉल हायजेनिक आहे का? नागपुरात करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 10:34 IST

नागरिकांना स्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ देणे ही रेस्टॉरंट चालकांची जबाबदारी आहे. मैत्री परिवार ही सामाजिक संस्था रेस्टॉरंट चालकांना ही जबाबदारी समाजावून सांगणार आहे. संस्थेतर्फे शहरात ‘हायजीन नं. १’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या माध्यमातून रेस्टॉरंट चालकांना स्वच्छतेचे नामांकनही दिले जाईल.

ठळक मुद्देमैत्री परिवार संस्था राबविणार संकल्पनाविष्णू मनोहर करणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ किंवा फूडस्टॉलवर जेवायला किंवा काही खायला जातो त्यावेळी आपल्या समोरचे सर्व छानच दिसते. मात्र हे पदार्थ जिथे तयार होतात, ते किचन व आसपासची अस्वच्छता व काम करणाऱ्यांची अवस्थाही वाईट असते. नागरिकांना स्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ देणे ही रेस्टॉरंट चालकांची जबाबदारी आहे.मैत्री परिवार ही सामाजिक संस्था रेस्टॉरंट चालकांना ही जबाबदारी समाजावून सांगणार आहे. संस्थेतर्फे शहरात ‘हायजीन नं. १’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या माध्यमातून रेस्टॉरंट चालकांना स्वच्छतेचे नामांकनही दिले जाईल, अशी माहिती संस्थेचे प्रा. संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.वैशाली गांधी यांनी अहमदनगरमध्ये राबविलेली ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. ही संकल्पना घेऊन मैत्री परिवारतर्फे शहरातील रेस्टॉरंट चालकांना हायजिनीक पद्धत अवलंबण्याचे मार्गदर्शन करणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या अभियानाचे नेतृत्व करणार आहेत. याअंतर्गत संस्थेतर्फे पाच-पाच व्यक्तींचे पथक तयार करून सहा महिने शहरातील रेस्टॉरंट, खानावळी, स्ट्रीट फूड, फूड ट्रॅक आदी लोकांकडे भेटी देऊन त्यांना स्वच्छता पाळण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या पथकांमध्ये डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. विष्णू मनोहर यांनी सांगितले, या अभियानांतर्गत किचनचा परिसर, तेथील भिंती, फॅन, किचन ओटा, भांड्यांची स्वच्छता, ते ठेवण्याची जागा, भाजीपाल्याची योग्य व्यवस्था, धुण्याच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पेस्टकंट्रोल आदींसह काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, अ‍ॅप्रान, केस, नखे, चप्पल, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे कापड अशा सर्व गोष्टींबाबत चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. या व्यावसायिकांना अभियानाचे सभासद बनवून वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. या भेटीदरम्यान संबंधित हॉटेल चालकांनी मार्गदर्शन केल्यानुसार बदल केला का, हे पाहण्यात येईल. ज्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या त्यांना प्रशस्तीपत्र देऊन ‘हायजीन नं. १’चे नामांकन दिले जाईल. व्यावसायिक हे प्रशस्तीपत्र दर्शनी भागात लावेल, जेणेकरून संबंधित रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता पाळल्या जात असल्याची खात्री येथे येणाºया नागरिकांना मिळेल व ते निर्धोकपणे जेवणाचा आनंद घेतील.रेस्टॉरंट व्यावसायिक स्वेच्छेने हे सभासदत्व स्वीकारू शकतात. मात्र यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणाऱ्यास हायजीनिक वातावरण निर्माण होईल असा विश्वास मनोहर यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला प्रमोद पेंडके उपस्थित होते.

टॅग्स :foodअन्न