शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य? ; रजिया पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 11:26 IST

बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात आठ दिवसात उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दोन घटना म्हणजे अमानवी राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सन्मानाचा नारा देणारे सरकार सत्तेत आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा जप करणारी पाठशाळा नागपुरात असतानाही अबोध बालिकेवर अमानुष अत्याचार होऊन त्याचे समर्थन करणारे मोर्चे काढले जातात. यावरून बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप रविवारी दीक्षाभूमी येथे झाला. ‘राष्ट्रनिर्मितीकरीता महिलांची भूमिका’ याविषयावर परिसंवादात प्रमुख वक्त्या म्हणून मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पुण्याच्या रजिया पटेल बोलत होत्या. डॉ. सरोज आगलावे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या बनारस विद्यापीठाच्या डॉ. इंदू चौधरी यांच्यासह ओबीसी महासंघाच्या शरयू तायवाडे, मंजुषा सावरकर, लेखिका अरुणा सबाने, बेनझीर खान, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जिचकार आदी उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रनेही कठुआमधील घटनेला भयावह संबोधून निषेध केला आहे. असे असताना काहींनी धर्मद्वेषातून बलात्काराचे समर्थन करणारे मोर्चे काढले, हे त्यापेक्षा भयानक आहे. यामध्ये दोन आमदारांचाही समावेश होता.या घटनात पितृसत्ताक समाजातील लिंगभेदाचे, धर्माचे आणि जातीभेदाचे धागे जुळले आहेत. ही कोणती संस्कृती आहे? वास्तविक ही स्थिती जुनी मनुवादी व्यवस्था आणण्याचे संकेत आहेत. अशा मानसिकतेच्या लोकांना संविधानामुळे महिलांना, दलितांना मिळालेला सन्मान मान्य नाही.यावेळी इंदू चौधरी यांनी संविधान जिवंत असेपर्यंत बाबासाहेब आमच्यामध्ये जिवंत असल्याची भावना व्यक्त केली. मनुवादी मानसिकतेचे लोक जातीव्यवस्था मानणाऱ्या दुसऱ्यांकडून अत्याचार करतात व स्वत: मात्र गप्प राहतात कारण त्यांना निवडणुका आल्या की तुमचे व्होट हवे असते. हे कोण लोक आहेत, ज्यांना संविधान उद्ध्वस्त करायचे आहे? यावेळी डॉ. सरोज आगलावे यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षशीला वाघदरे यांनी केले तर संचालन वीणा राऊत यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन.आर. सुटे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती