शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या शाैर्याच्या स्टाेरीज ऐकायला तू हवा हाेतास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव ...

नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव लागल हाेतं. कारगिल युद्धात २० ते ३५ वर्षांच्या ५२७ वीरपुत्रांनी भारतमातेसाठी प्राणार्पण केले हाेते. त्यातीलच एक शाैर्यपूर्ण गाथा आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची.

पाकिस्तानी सैन्यात ‘शेर शाहा’ या टाेपण नावाने ओळख हाेती. कॅप्टन विक्रम व कॅप्टन संजीव जमवाल यांच्या नेतृत्वात कारगिलच्या पाॅईंट ५१४० वर विजय मिळविला हाेता. १७,००० फूट उंचीवर केलेल्या या ऑपरेशनमधे एकही जीवहानी न होता पाकड्यांना हाकलून येथे १३ जम्मू काश्मीर लाईट इन्फन्ट्रीच्या सैनिकांनी कब्जा केला व तिरंगा ध्वज फडकाविला. त्यांची व्हिक्ट्री साईन पाहून हर्षाेल्हासित झालेल्या सेनाध्यक्ष जनरल व्ही. मलिकनी अभिनंदन करून तुला काय हव, असे विचारले. विक्रम बत्रा उत्तरले, ‘सर ये दिल मांगे माेअर...’ या पाॅईंटवर विजय मिळविल्यानंतर २६ जूनपर्यंत तेथे मुक्काम केला. त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात परतल्यानंतर पुन्हा पाक सैनिकांनी कब्जा केलेल्या ‘पाॅईंट ४८७५’ च्या माेहिमेसाठी सज्ज झाली. ६ जुलैपर्यंत या पाॅईंटवर विजय मिळविता आला नव्हता, त्यामुळे कॅप्टन बत्रा यांच्या कंपनीला तेथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅप्टन बत्रा यांची कंपनी तेथे पाेहचताच तेथील भारतीय सैनिकांमध्ये स्फुरण निर्माण झाले. पाकिस्तानी सैनिकांकडेही ही बातमी पाेहचली. ‘शेर शाहा, उपर आ गये पर वापस नही जाने देंगे...’, असा दंभ त्यांनी भरला. विक्रम यांनीही ‘उपर हम नही, तुम्हे भेजेंगे’, असे उत्तर दिले. त्यानुसार ७ जुलैच्या रात्री त्यांनी लेजवर हल्ल्याची तयारी केली. थकवा व ताप असतानाही. बर्फवृष्टीमुळे हाड गाेठविणाऱ्या थंडीत ही कंपनी लढण्यास सज्ज झाली.

कॅप्टन विक्रम यांनी या पाॅईंटवर माेठ्या शाैर्याने शत्रूला नामाेहरम करून पराजित केले. त्यावेळचा प्रत्यक्ष घटनाक्रम शरीरात कंपने निर्माण करणाराच आहे. यावेळी शत्रूच्या गाेळ्यांनी ते जखमी झाले हाेते. या दरम्यान स्फाेटात पाय तुटलेल्या सहकाऱ्याला वाचविण्यास ते त्याच्या जवळ गेले. सुभेदारांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ‘तुम्ही मुलाबाळाचे माणूस आहात, तुम्हीच मागे हटा’, असा आदेश देत समाेर जाऊन जखमी सहकाऱ्याला खडकामागे आणले. मात्र यावेळीच लपून असलेल्या शत्रूने त्यांच्या छातीवर गाेळ्या झाडल्या. या वीरपुत्राने त्या जागी आपला देह ठेवला. ‘गड आला पण सिंह गेला’, याप्रमाणे पाॅईंटवर विजय मिळविला पण सिंह धारातीर्थी पडला. कॅप्टन विक्रम यांना मरणाेपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कॅप्टन विक्रम हे बालमैत्रिण डिम्पलशी लग्न करणार हाेते पण त्याआधीच देवाकडे जावे लागले. त्यांचे स्मरण करताना ही बालमैत्रिण लिहिते, ‘तुझ्या आठवणीतून वेगळे हाेणारा एकही दिवस जात नाही. लाेक तुझ्याबद्दल विचारतात तेव्हा आजही गर्व वाटतो व उर भरून येताे. तू माझ्या हृदयात, आयुष्यात सदैव राहशील व आपण पुन्हा भेटू. मात्र तुझ्याच शाैर्यगाथा ऐकायला तू येथे हवा हाेतास विक्रम...’