शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ‘सौर ऊर्जा’ उभारा, मी ‘भूमिगत यंत्रणा’ जोडतो; ऊर्जामंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:28 IST

मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला.

ठळक मुद्दे ‘एक शेतकरी, एक सबस्टेशन’ नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधीकाळी आठ रुपयांची सौरऊर्जेची वीज आता २ रुपये ६० पैशांवर आली. ही वीज आता गावागावात जोडायची आहे. सर्व नळयोजना सौर ऊर्जेवर शिफ्ट करायच्या आहेत. हा संकल्प पुढे न्यायचा असून आधी स्वत:च्या गावात स्वत:चा सौर प्रकल्प तयार करा. दोन सिमेंटचे रस्ते कमी करा. नालीचे काम तूर्त थांबवा, ते नंतर करू. असे म्हणत, मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बावनकुळे बोलत होते.यावेळी मंचावर खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, पालिकेच्या नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आनंद राऊत, जयकुमार वर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, पंचायत समितीच्या सभापती शालु मेंढुले, भिवापूर पंचायत समितीचे सभापती केशव ब्रम्हे, कुही पंचायत समितीच्या सभापती सुनीता पडोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, भिवापूर नगरपंचायतच्या अध्यक्षा किरण नागरीकर, कुही नगरपंचायतच्या अध्यक्षा चंदा वानखेडे आदींची उपस्थिती होती.डिसेंबर अखेरीस १७ लाख कुटुंबीयांपर्यंत वीज पोहचेल. ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर ट्रान्सफार्मर करणे, ट्रिपींग बंद करणे, प्रशासकीय कार्यालयाची रचना करणे आदी महत्त्वपूर्ण कामेही लवकरच पूर्ण होतील. फिडरवर जास्त ट्रिपींग निघाले तर वेतनकपात करणार असा इशारा देत फिडरमध्ये ‘फिट’ राहा. वीज ही सेवा आहे. जनतेला सेवा द्या, अशीही बाब बावनकुळे यांनी व्यक्त केली.

गावागावात ‘ग्राम मॅनेजर’राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतीमध्ये लाईनमन नाही, ही खंत व्यक्त करीत ‘ग्रामविद्युत व्यवस्थापक’ गावागावात नेमायचे आहेत. या ग्राम मॅनेजरच्या माध्यमातून गावाच्या विजेचा कारभार चालेल. पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात ७७८ मुलांची नियुक्ती उंबरठ्यावर आहे. या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा अधिकाधिक मजबूत होईल. शिवाय गावपातळीवर हकनाक बळीही जाणार नाहीत, ही बाब चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे