शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

तुम्ही ‘सौर ऊर्जा’ उभारा, मी ‘भूमिगत यंत्रणा’ जोडतो; ऊर्जामंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:28 IST

मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला.

ठळक मुद्दे ‘एक शेतकरी, एक सबस्टेशन’ नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधीकाळी आठ रुपयांची सौरऊर्जेची वीज आता २ रुपये ६० पैशांवर आली. ही वीज आता गावागावात जोडायची आहे. सर्व नळयोजना सौर ऊर्जेवर शिफ्ट करायच्या आहेत. हा संकल्प पुढे न्यायचा असून आधी स्वत:च्या गावात स्वत:चा सौर प्रकल्प तयार करा. दोन सिमेंटचे रस्ते कमी करा. नालीचे काम तूर्त थांबवा, ते नंतर करू. असे म्हणत, मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बावनकुळे बोलत होते.यावेळी मंचावर खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, पालिकेच्या नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आनंद राऊत, जयकुमार वर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, पंचायत समितीच्या सभापती शालु मेंढुले, भिवापूर पंचायत समितीचे सभापती केशव ब्रम्हे, कुही पंचायत समितीच्या सभापती सुनीता पडोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, भिवापूर नगरपंचायतच्या अध्यक्षा किरण नागरीकर, कुही नगरपंचायतच्या अध्यक्षा चंदा वानखेडे आदींची उपस्थिती होती.डिसेंबर अखेरीस १७ लाख कुटुंबीयांपर्यंत वीज पोहचेल. ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर ट्रान्सफार्मर करणे, ट्रिपींग बंद करणे, प्रशासकीय कार्यालयाची रचना करणे आदी महत्त्वपूर्ण कामेही लवकरच पूर्ण होतील. फिडरवर जास्त ट्रिपींग निघाले तर वेतनकपात करणार असा इशारा देत फिडरमध्ये ‘फिट’ राहा. वीज ही सेवा आहे. जनतेला सेवा द्या, अशीही बाब बावनकुळे यांनी व्यक्त केली.

गावागावात ‘ग्राम मॅनेजर’राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतीमध्ये लाईनमन नाही, ही खंत व्यक्त करीत ‘ग्रामविद्युत व्यवस्थापक’ गावागावात नेमायचे आहेत. या ग्राम मॅनेजरच्या माध्यमातून गावाच्या विजेचा कारभार चालेल. पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात ७७८ मुलांची नियुक्ती उंबरठ्यावर आहे. या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा अधिकाधिक मजबूत होईल. शिवाय गावपातळीवर हकनाक बळीही जाणार नाहीत, ही बाब चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे