शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

यस्स ! व्ही आर द बेस्ट

By admin | Updated: February 16, 2015 02:19 IST

भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले.

नागपूर : भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले. आधीच रविवार अन् त्यात ‘हाय व्होल्टेज’ सामना असल्याने दिवसभर ज्या रस्त्यांवर शुकशुकाट होता, ते सर्व रस्ते सळसळत्या चैतन्याने वाहू लागले होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील प्रत्येक भागात अक्षरश: दिवाळी साजरी झाली. यंगिस्तानचा उत्साह तर ओसंडून वाहत होता अन् धरमपेठ, सदर, वर्धमान नगर, महाल, फुटाळा या परिसरात जोरदार जल्लोष झाला. ‘कमॉन इंडिया’, ‘भारत माता की जय’, ‘चक दे इंडिया’ या घोषणांनी हे परिसर दणाणून निघाले होते. भारत-पाक सामना रविवारीच आल्याने शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणीच होती. एरवी सकाळी न उठणारे महाभागदेखील सर्व आवरून ७.३० पासूनच दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. सामना सुरू होण्याच्या अगोदर शहरातील काही मंदिरात चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली. धरमपेठेत तर विश्वचषकाच्या प्रतिकृतीची लहान मुलांनी आरतीदेखील केली. टीव्ही स्क्रीनला डोळे लावून बसलेले हजारो क्रिकेट रसिक विजयानंतर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर उतरले. घोषणा, ढोलताशांच्या गजरात नाच-गाणी अन् जोरदार आतषबाजी यामुळे संपूर्ण शहरात उत्साह दिसून आला. महाल-इतवारी परिसरात तर फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. शहरातील अ़नेक चौकांमध्ये मिठाई, साखर, लाडू वाटण्यात आले.विश्वचषक जिंकल्याचा अनुभव२ एप्रिल २०११ साली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर उपराजधानीत ‘न भूतो न भविष्यति’ असे ‘सेलिब्रेशन’ झाले होते. त्यानंतर विश्वचषकातला रविवारचा पहिलाच सामना होता. पाकिस्तानवर विजय मिळवून ‘टीम इंडिया’ने विश्वचषक जिंकल्याचा आनंद दिला आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे ‘सेलिब्रेशन’देखील तसेच ‘रॉकिंग’ होते. लक्ष्मीभुवन चौकात तर उत्साहाला अक्षरश: उधाणच आले होते. कोणी पायी, कोणी दुचाकी तर कोणी कारमधून विजयाचा आनंद साजरा केला.