शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

यस्स ! व्ही आर द बेस्ट

By admin | Updated: February 16, 2015 02:19 IST

भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले.

नागपूर : भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले. आधीच रविवार अन् त्यात ‘हाय व्होल्टेज’ सामना असल्याने दिवसभर ज्या रस्त्यांवर शुकशुकाट होता, ते सर्व रस्ते सळसळत्या चैतन्याने वाहू लागले होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील प्रत्येक भागात अक्षरश: दिवाळी साजरी झाली. यंगिस्तानचा उत्साह तर ओसंडून वाहत होता अन् धरमपेठ, सदर, वर्धमान नगर, महाल, फुटाळा या परिसरात जोरदार जल्लोष झाला. ‘कमॉन इंडिया’, ‘भारत माता की जय’, ‘चक दे इंडिया’ या घोषणांनी हे परिसर दणाणून निघाले होते. भारत-पाक सामना रविवारीच आल्याने शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणीच होती. एरवी सकाळी न उठणारे महाभागदेखील सर्व आवरून ७.३० पासूनच दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. सामना सुरू होण्याच्या अगोदर शहरातील काही मंदिरात चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली. धरमपेठेत तर विश्वचषकाच्या प्रतिकृतीची लहान मुलांनी आरतीदेखील केली. टीव्ही स्क्रीनला डोळे लावून बसलेले हजारो क्रिकेट रसिक विजयानंतर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर उतरले. घोषणा, ढोलताशांच्या गजरात नाच-गाणी अन् जोरदार आतषबाजी यामुळे संपूर्ण शहरात उत्साह दिसून आला. महाल-इतवारी परिसरात तर फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. शहरातील अ़नेक चौकांमध्ये मिठाई, साखर, लाडू वाटण्यात आले.विश्वचषक जिंकल्याचा अनुभव२ एप्रिल २०११ साली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर उपराजधानीत ‘न भूतो न भविष्यति’ असे ‘सेलिब्रेशन’ झाले होते. त्यानंतर विश्वचषकातला रविवारचा पहिलाच सामना होता. पाकिस्तानवर विजय मिळवून ‘टीम इंडिया’ने विश्वचषक जिंकल्याचा आनंद दिला आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे ‘सेलिब्रेशन’देखील तसेच ‘रॉकिंग’ होते. लक्ष्मीभुवन चौकात तर उत्साहाला अक्षरश: उधाणच आले होते. कोणी पायी, कोणी दुचाकी तर कोणी कारमधून विजयाचा आनंद साजरा केला.