शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

होय... नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्त्या घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2022 08:10 IST

Nagpur News स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनेक वस्त्या घाणीच्या विळख्यात असून रस्ते, पाणी, गटार यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे शासनातर्फेच सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देरस्ते, पाणी, गटारसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव

नागपूर: उपराजधानीत मोठा गाजावाजा करत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्याची सुरुवात झाली व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठदेखील थोपटून घेतली. मात्र, प्रत्यक्षात तेथील अनेक भागांत अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याची नागरिकांकडून ओरड होते. प्रशासनाकडून याचे खंडन करण्यात येत असताना राज्य शासनानेच याबाबत कबुली दिली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनेक वस्त्या घाणीच्या विळख्यात असून रस्ते, पाणी, गटार यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे शासनातर्फेच सांगण्यात आले आहे.

विधान परिषदेत यासंदर्भात अभिजीत वंजारी, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी याबाबत कबुली दिली आहे. पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील धरमनगर, के.के. हाऊसिंग सोसायटी, जगदंबा सोसायटी, किर्तीधर लेआऊट, आर.बी. हाऊसिंग सोसायटी या परिसरांमध्ये रस्ते, पाणी, गटार इत्यादी मूलभूत सुविधाच नाही. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारीदेखील करण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून संथ गतीने काम सुरू होते. यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न मांडण्यात आला. याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लेखी उत्तर दिले असून या वस्त्या घाणीच्या विळख्यात असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

सांडपाण्याची समस्या कायम

या वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी गटाराची योग्य सुविधा नाही. नागपूर स्मार्ट सिटी ॲंड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशनमार्फत चार जलकुंभांचे काम सुरू आहे. तसेच मुख्य रस्त्यालगत मल:निस्सारण, पाणीपुरवठा इत्यादी कामे विकासकामांअंतर्गत करण्यात येत आहेत. नासुप्रतर्फे अनिधकृत भूखंडांचे नियमितीकरण झाल्यानंतर अंतर्गत रस्ते, गटारे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यांचे काम संथगतीने

स्मार्ट सिटीने २०१८मध्ये सुमारे ५२ किलोमीटरच्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती केली. यात पूल, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, पाणीपुरवठा, रस्ते दुभाजक, फुटपाथ आदी कामांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर हे काम अतिशय संथ गतीने झाले. स्मार्टपणाची कुठलीही चिन्हे तिथे दिसून येत नाहीत. अनेक ठिकाणी तर मोकाट चरणारी गुरे- ढोरे दिसून येतात.

अधिकाऱ्यांनी केले काय?

राज्य शासनानेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्त्या घाणीच्या विळख्यात असल्याची कबुली दिल्यावर कारभार पाहणाऱ्या व पाहिलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर स्मार्ट सिटी ॲंड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशनवर आलेल्या अधिकाऱ्यांना ही दुरवस्था दिसली नाही का व त्यासाठी तातडीने प्रभावी पावले का उचलण्यात आली नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी