शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

होय... नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्त्या घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2022 08:10 IST

Nagpur News स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनेक वस्त्या घाणीच्या विळख्यात असून रस्ते, पाणी, गटार यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे शासनातर्फेच सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देरस्ते, पाणी, गटारसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव

नागपूर: उपराजधानीत मोठा गाजावाजा करत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्याची सुरुवात झाली व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठदेखील थोपटून घेतली. मात्र, प्रत्यक्षात तेथील अनेक भागांत अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याची नागरिकांकडून ओरड होते. प्रशासनाकडून याचे खंडन करण्यात येत असताना राज्य शासनानेच याबाबत कबुली दिली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनेक वस्त्या घाणीच्या विळख्यात असून रस्ते, पाणी, गटार यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे शासनातर्फेच सांगण्यात आले आहे.

विधान परिषदेत यासंदर्भात अभिजीत वंजारी, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी याबाबत कबुली दिली आहे. पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील धरमनगर, के.के. हाऊसिंग सोसायटी, जगदंबा सोसायटी, किर्तीधर लेआऊट, आर.बी. हाऊसिंग सोसायटी या परिसरांमध्ये रस्ते, पाणी, गटार इत्यादी मूलभूत सुविधाच नाही. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारीदेखील करण्यात आल्या. मात्र, प्रशासनाकडून संथ गतीने काम सुरू होते. यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न मांडण्यात आला. याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच लेखी उत्तर दिले असून या वस्त्या घाणीच्या विळख्यात असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

सांडपाण्याची समस्या कायम

या वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी गटाराची योग्य सुविधा नाही. नागपूर स्मार्ट सिटी ॲंड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशनमार्फत चार जलकुंभांचे काम सुरू आहे. तसेच मुख्य रस्त्यालगत मल:निस्सारण, पाणीपुरवठा इत्यादी कामे विकासकामांअंतर्गत करण्यात येत आहेत. नासुप्रतर्फे अनिधकृत भूखंडांचे नियमितीकरण झाल्यानंतर अंतर्गत रस्ते, गटारे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होतील, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यांचे काम संथगतीने

स्मार्ट सिटीने २०१८मध्ये सुमारे ५२ किलोमीटरच्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती केली. यात पूल, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, पाणीपुरवठा, रस्ते दुभाजक, फुटपाथ आदी कामांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर हे काम अतिशय संथ गतीने झाले. स्मार्टपणाची कुठलीही चिन्हे तिथे दिसून येत नाहीत. अनेक ठिकाणी तर मोकाट चरणारी गुरे- ढोरे दिसून येतात.

अधिकाऱ्यांनी केले काय?

राज्य शासनानेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील वस्त्या घाणीच्या विळख्यात असल्याची कबुली दिल्यावर कारभार पाहणाऱ्या व पाहिलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर स्मार्ट सिटी ॲंड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशनवर आलेल्या अधिकाऱ्यांना ही दुरवस्था दिसली नाही का व त्यासाठी तातडीने प्रभावी पावले का उचलण्यात आली नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी