शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

यंदाचा अर्थसंकल्प ‘गेम चेंजर’

By admin | Updated: March 9, 2015 01:59 IST

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच वेळ असल्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपा शासना

अर्थतज्ज्ञांचा निष्कर्ष : जगाचा गमावलेला विश्वास परतणारनागपूर : लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच वेळ असल्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपा शासनाचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना वन डे किंवा टष्ट्वेंटी-२० पद्धतीला दूर ठेवून टेस्ट क्रिकेटप्रमाणे खेळ केला आहे. अर्थसंकल्पात दूरदृष्टी ठेवून तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यावर काटेकोर अंमलबजावणी झाल्यास हा अर्थसंकल्प देशासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. या अर्थसंकल्पाने जगाचा गमावलेला विश्वास परत आणला, असा निष्कर्ष अर्थतज्ज्ञांनी नोंदविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील व सीए जुल्फेश शाह यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर चौकातील साई सभागृह येथे रविवारी ‘अर्थसंकल्प-२०१५’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. टी.एस. रावल (नागपूर) व सीए यज्ञेश देसाई (मुंबई) हे मुख्य वक्ते होते. त्यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा करतानाच अनेक कमकुवत दुव्यांवरही प्रकाश टाकला.रावल म्हणाले, ७१ टक्के जनता शेतीवर अवलंबून असली तरी देशाच्या एकूण उत्पन्नात शेतीचा वाटा केवळ ११.५ टक्के आहे. शेतीचा विकास दर ३ टक्के एवढा कमी आहे. हा विकासदर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आजही जुन्याच तंत्रज्ञानाद्वारे शेती केली जात असल्यामुळे विकास खुंटला आहे. या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती, पण शासनाने विशेष काही केले नाही. येत्या वर्षभरात शेतीच्या विकासाकरिता ८.५ लाख कोटी रुपये भांडवल उभे करण्यात येणार आहे. बँकांनी पुढे आल्यास हे कठीण लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळू शकते. कोणीही दावा न केलेले ‘पीपीएफ’मधील तीन हजार व ‘ईपीएफ’मधील सहा हजार कोटी रुपये काढून सामाजिक कार्यासाठी वापरण्याची शासनाची योजना आहे. देशात २० हजार टन सोने निरुपयोगी पडून आहे. हे सोने बाहेर काढण्यासाठी सोन्याच्या ठेवीवर व्याज देण्याची योजना आहे. कौशल्य विकासावर जास्त भर नाही. काळ्या पैशासाठी कठोर तरतुदी केल्या आहेत, असे रावल यांनी सांगितले.स्थावर मालमत्ता खरेदी करताना २० हजारापेक्षा जास्त रोख रक्कम दिल्यास पेनाल्टी भरावी लागेल, असे देसाई यांनी सांगितले. एक कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्नावर अधिभार वाढविण्यात आला आहे. सहकारी बँकेतील ‘आरडी’वर टीडीएस कापण्यात येणार आहे. ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड’ कररहित करण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)