शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दीक्षाभूमीबाहेर यंदा स्टॉलला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:22 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतात.

ठळक मुद्देसेवाभावी संस्थांमध्ये असंतोष : सुरक्षा महत्त्वाची, पण सुविधा कोण पुरविणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतात. दीक्षाभूमीच्या भोवताल लहान-मोठे स्टॉल लावून अनुयायांना सेवा दिली जाते. यावर्षी मात्र हे चित्र दिसणार नाही. सेवाभावी संस्थांचे स्टॉल लावण्यास यावर्षी मनाई करण्यात आली आहे. यामुळे अशा संस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.गेल्या ५० वर्षांपासून दीक्षाभूमीच्या बाह्य परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, शासकीय तसेच वैद्यकीय संस्था, संघटनांमार्फत स्टॉल लावून सेवाकार्य केले जाते. यामध्ये फुले, शाहू, आंबेडकरी आणि बौद्ध साहित्य विक्रीच्या स्टॉलसह वैद्यकीय सुविधा पुरविणारे, शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणाºया संस्थांमार्फत स्टॉल लावले जातात. याशिवाय खेड्यापाड्यातून येणाºया अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून या संस्था पाणीवाटप, भोजनदान यासह अनेक प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध करतात. कृ षी महाविद्यालय वसतिगृह ते चोखामेळा वसतिगृह आणि आयटीआय कॉलेजपर्यंतच्या परिसरात २०० च्यावर स्टॉल दरवर्षी लागतात. यावर्षी मात्र महानगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे सुरक्षेच्या कारणाने स्टॉल लावण्यास परवानगी नाकारल्या गेली आहे. दीक्षाभूमीच्या आंतर भागातही यावेळी केवळ बौद्ध साहित्य विक्रीच्या स्टॉल्सना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.अ.भा. धम्मसेनेचे शहर अध्यक्ष रवी शेंडे हेही संघटनेमार्फत दरवर्षी या परिसरात स्टॉल लावून अनुयायांसाठी सेवाकार्य करीत असतात. यावर्षी त्यांना परवानगी देण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस आणि मनपा प्रशासनातर्फे यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचे लोकमतशी बोलताना ते म्हणाले. मनपा व पोलीस विभागाच्या नकारानंतर शेंडे यांनी स्मारक समितीकडे धाव घेतली. मात्र त्यांनीही न्यायालयाचा तसा आदेशच असल्याचे सांगत, काही करण्यास नकार दिल्याचे रवी शेंडे यांनी सांगितले. १९५६ पासून होणाºया धम्मदीक्षा सोहळ्यास लाखो लोक दीक्षाभूमीवर येतात. आंबेडकरी संघटना व सेवाभावी संस्थेनी इतक्या वर्षांपासून लाखो अनुयायांच्या सोयीसुविधांची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. आता मात्र स्टॉलला परवानगी नाकारल्याने या अनुयायांची गैरसोय होणार आहे. त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी शासन किंवा महापालिका पार पाडेल काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लाखो अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी स्मारक समितीने विविध संघटनांना सोबत घेऊन हा अनुचित निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.दीक्षाभूमीवर होणारा धम्मदीक्षा समारंभ हा काही उत्सव किंवा मेळावा नाही. हा समारंभ म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांसाठी प्रेरणेचा क्षण आहे. याकडे धार्मिक मेळावा म्हणून पाहू नका. हे देशविदेशात तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविण्याचे केंद्र व कार्य आहे. त्यामुळे आमच्या या स्टॉलमुळे सुरक्षेत कुठलीही अडचण होणार नाही याची हमी आम्ही देतो. यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाईल.- रवी शेंडे, शहराध्यक्ष, अ.भा. धम्मसेनान्यायालयाच्या आदेशानुसार उत्सव किंवा मेळाव्यादरम्यान फुटपाथवर स्टॉल किंवा दुकान लावण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार स्मारक समितीचा नाईलाज आहे. दीक्षाभूमीच्या आंतरपरिसरातही केवळ पुस्तकांच्या विक्रीचे स्टॉल लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र बाह्य परिसरात भोजनदान करणाºया सेवाभावी संस्थांसाठी फूडझोन उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही करीत आहोत.- विलास गजघाटे,सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती