शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

न्यायाधीश घडवणाऱ्या अभ्यासक्रमात यावर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 08:29 IST

Nagpur News उपराजधानीतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने विद्यार्थ्यांमध्ये न्यायाधीश होण्याकरिता आवश्यक असलेले गुण व कौशल्य विकसित करण्यासाठी पाच वर्षे कालावधीचा प्रभावी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात यावर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपराजधानीतील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : उपराजधानीतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने विद्यार्थ्यांमध्ये न्यायाधीश होण्याकरिता आवश्यक असलेले गुण व कौशल्य विकसित करण्यासाठी पाच वर्षे कालावधीचा प्रभावी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात यावर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी पहिल्या बॅचमध्ये ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू आहे.

बी. ए. एलएल. बी. (ऑनर्स इन ॲडज्युडिकेशन ॲण्ड जस्टिसिंग) असे या पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे नाव आहे. नागपूरचे सुपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विचारांमधून या अभ्यासक्रमाचा जन्म झाला. ते या विद्यापीठाचे प्रथम कुलपती होत. सध्या ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई सांभाळत आहेत. विद्यापीठाचे ओएसडी (अकॅडेमिक) राजेशकुमार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी मिळाली आहे. अभ्यासक्रमात प्रवेश पक्का करण्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण निवड प्रक्रियेतून जावे लागते. त्यांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये गट चर्चा घडवून आणली जाते. तसेच, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचा समावेश असलेली समिती विद्यार्थ्यांची मुलाखत घेते. या अभ्यासक्रमाची शिक्षण पद्धत इतर अभ्यासक्रमापेक्षा वेगळी असून त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ते अंतिम वर्षाला असतानाच न्यायाधीशपदाची परीक्षा देता यावी याकरिता सरकारची परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अभ्यासक्रमामुळे कनिष्ठ न्यायालयांना चांगले न्यायाधीश मिळतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सदर अभ्यासक्रम उत्तीर्ण करणारे विद्यार्थी वकिली व्यवसायातही करिअर करू शकणार आहेत.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल व परिपूर्ण व्यावहारिक प्रशिक्षण, नियमित इंटर्नशिप, न्यायिक कामकाज, सहा महिने ॲप्रेन्टिसशिप, प्रत्यक्ष न्यायालयांना भेटी, चिकित्सक विधी शिक्षण, देशातील विविधता, सामाजिक एकता, सामाजिक आणि सांस्कृतिक रचना याचे ज्ञान ही या अभ्यासक्रमाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.

प्रवेशाकरिता पात्रता

या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्याने क्लॅट परीक्षा देणे आवश्यक आहे. तसेच, इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षेत खुला, ओबीसी व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्याला किमान ४५ टक्के तर, अन्य आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला किमान ४० टक्के गुण असणे गरजेचे आहे. याशिवाय विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि अर्ज करण्याच्या तारखेस त्याचे वय २० वर्षांपेक्षा अधिक नसावे.

टॅग्स :Courtन्यायालय