शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उत्तर प्रदेशचा अध्यक्ष नेमणे चुकीचे; शशी थरूर यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:43 IST

Nagpur News निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमीचे दर्शन घेतले

नागपूरः अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले. यावेळी थरूर म्हणाले, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाही, हे देखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत असल्याचा दावा, थरूर यांनी केला. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींचे पूर्ण नाव नाही. काहींचे पत्ते नाही तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. उत्तर प्रदेशात तर एक हजारावर प्रतिनिधी आहेत. त्यांचे संपर्क क्रमांकच नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधने एक मोेठे आव्हान आहे. तरी आपण सर्वांशी संपर्कासाठी नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के तिकीट हे ५० वर्षे वयाखालील व्यक्तिंना दिली जावी, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रिंगणातून माघार नाहीच

- कुणालातरी तत्त्वांसाठी उभे राहावेच लागेल. त्यामुळेच आपण ही निवडणूक लढत आहे. अनेकांकडून माघार घेण्यासाठी निरोप आले आहेत. मात्र, आपण रिंगणातून माघार घेणार नाहीत, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. यावेळी आमीन झवेरी, माजी आ. आशिष देशमुख, प्रदेश सचिव हैदरअली दोसानी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या हिताची

- राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेस पक्षाच्या हिताची आहे. या यात्रेमुळे देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साह वाढत आहे. या यात्रेतून एक नवा जयप्रकाश नारायण उदयास येणार आहे.

गांधी कुटुंबीय ही पक्षाची ताकद आहे. लोक त्यांच्यावर, त्यांनी केलेल्या त्यागामुळे मनापासून प्रेम करतात, असेही थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी