शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उत्तर प्रदेशचा अध्यक्ष नेमणे चुकीचे; शशी थरूर यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:43 IST

Nagpur News निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमीचे दर्शन घेतले

नागपूरः अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले. यावेळी थरूर म्हणाले, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाही, हे देखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत असल्याचा दावा, थरूर यांनी केला. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींचे पूर्ण नाव नाही. काहींचे पत्ते नाही तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. उत्तर प्रदेशात तर एक हजारावर प्रतिनिधी आहेत. त्यांचे संपर्क क्रमांकच नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधने एक मोेठे आव्हान आहे. तरी आपण सर्वांशी संपर्कासाठी नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के तिकीट हे ५० वर्षे वयाखालील व्यक्तिंना दिली जावी, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रिंगणातून माघार नाहीच

- कुणालातरी तत्त्वांसाठी उभे राहावेच लागेल. त्यामुळेच आपण ही निवडणूक लढत आहे. अनेकांकडून माघार घेण्यासाठी निरोप आले आहेत. मात्र, आपण रिंगणातून माघार घेणार नाहीत, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. यावेळी आमीन झवेरी, माजी आ. आशिष देशमुख, प्रदेश सचिव हैदरअली दोसानी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या हिताची

- राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेस पक्षाच्या हिताची आहे. या यात्रेमुळे देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साह वाढत आहे. या यात्रेतून एक नवा जयप्रकाश नारायण उदयास येणार आहे.

गांधी कुटुंबीय ही पक्षाची ताकद आहे. लोक त्यांच्यावर, त्यांनी केलेल्या त्यागामुळे मनापासून प्रेम करतात, असेही थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी