शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उत्तर प्रदेशचा अध्यक्ष नेमणे चुकीचे; शशी थरूर यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:43 IST

Nagpur News निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमीचे दर्शन घेतले

नागपूरः अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले. यावेळी थरूर म्हणाले, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाही, हे देखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत असल्याचा दावा, थरूर यांनी केला. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींचे पूर्ण नाव नाही. काहींचे पत्ते नाही तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. उत्तर प्रदेशात तर एक हजारावर प्रतिनिधी आहेत. त्यांचे संपर्क क्रमांकच नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधने एक मोेठे आव्हान आहे. तरी आपण सर्वांशी संपर्कासाठी नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के तिकीट हे ५० वर्षे वयाखालील व्यक्तिंना दिली जावी, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रिंगणातून माघार नाहीच

- कुणालातरी तत्त्वांसाठी उभे राहावेच लागेल. त्यामुळेच आपण ही निवडणूक लढत आहे. अनेकांकडून माघार घेण्यासाठी निरोप आले आहेत. मात्र, आपण रिंगणातून माघार घेणार नाहीत, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. यावेळी आमीन झवेरी, माजी आ. आशिष देशमुख, प्रदेश सचिव हैदरअली दोसानी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या हिताची

- राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेस पक्षाच्या हिताची आहे. या यात्रेमुळे देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साह वाढत आहे. या यात्रेतून एक नवा जयप्रकाश नारायण उदयास येणार आहे.

गांधी कुटुंबीय ही पक्षाची ताकद आहे. लोक त्यांच्यावर, त्यांनी केलेल्या त्यागामुळे मनापासून प्रेम करतात, असेही थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी