शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उत्तर प्रदेशचा अध्यक्ष नेमणे चुकीचे; शशी थरूर यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:43 IST

Nagpur News निवडणूक प्रक्रियेदरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमीचे दर्शन घेतले

नागपूरः अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली.

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले. यावेळी थरूर म्हणाले, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाही, हे देखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत असल्याचा दावा, थरूर यांनी केला. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींचे पूर्ण नाव नाही. काहींचे पत्ते नाही तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. उत्तर प्रदेशात तर एक हजारावर प्रतिनिधी आहेत. त्यांचे संपर्क क्रमांकच नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधने एक मोेठे आव्हान आहे. तरी आपण सर्वांशी संपर्कासाठी नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के तिकीट हे ५० वर्षे वयाखालील व्यक्तिंना दिली जावी, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रिंगणातून माघार नाहीच

- कुणालातरी तत्त्वांसाठी उभे राहावेच लागेल. त्यामुळेच आपण ही निवडणूक लढत आहे. अनेकांकडून माघार घेण्यासाठी निरोप आले आहेत. मात्र, आपण रिंगणातून माघार घेणार नाहीत, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. यावेळी आमीन झवेरी, माजी आ. आशिष देशमुख, प्रदेश सचिव हैदरअली दोसानी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या हिताची

- राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ काँग्रेस पक्षाच्या हिताची आहे. या यात्रेमुळे देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साह वाढत आहे. या यात्रेतून एक नवा जयप्रकाश नारायण उदयास येणार आहे.

गांधी कुटुंबीय ही पक्षाची ताकद आहे. लोक त्यांच्यावर, त्यांनी केलेल्या त्यागामुळे मनापासून प्रेम करतात, असेही थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी