शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नगरसेवकांना न भेटण्याची आयुक्तांची भूमिका चुकीची :  महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:16 IST

नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देनगरसेवक ६० हजार लोकांचे प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व आमची कार्यशैली वेगवेगळी आहे. पदाधिकारी आणि प्रशासन एका गाडीची चाके आहेत. नगरसेवक प्रभागातील ६० हजार लोकांचे प्रतिनिधी आहेत. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली.सभागृहाच्या माध्यमातून महापौर शहर विकासाचे व नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. त्याची अंमलबजावणी आयुक्त करतात. शहरातील नागरिकांच्या समस्या व तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी झोन स्तरावर जनता दरबार सुरू केले. परंतु काही प्रकरणे न्यायालयात तर काही नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहेत. अतिरिक्त बांधकामाच्या काही प्रकरणात कम्पाऊं डिंग शुल्कासाठी नगररचना विभागाकडे अर्ज केले आहेत. एकाच प्रकरणाच्या अनेक तक्रारी आहेत. आयुक्त सुद्धा जनता दरबाराच्या माध्यमातून लोक ांच्या समस्या सोडवित असतील तर आनंदच असल्याची प्रतिक्रीया संदीप जोशी यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.शहरातील अतिक्रमणाला आळा बसावा यासाठी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. यासमितीनी केलेल्या शिफारशीनुसार नवीन नियम तयार करण्यात आले आहे. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात आहे. यात दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आठवडी बाजाराला शिस्त लावली जाणार आहे. शहरातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी रस्त्यावरील व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्त कारवाई करीत आहेत. आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांचा फोन आला होता. मी महापालिका मुख्यालयात नव्हतो. ते सोमवारी भेटणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.महापौर जनता दरबारांना चांगला प्रतिसादझोन स्तरावर महापौर जनता दरबारांचे आयोजन केले जात आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर आदी झोनमधील जनता दरबारला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आलेल्या नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका