शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुरुषांच्या शोषणावर लिहिणे दुर्मिळच

By admin | Updated: April 9, 2016 03:16 IST

साधारणत: लेखिका स्त्रीवादी झाल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या एका विशिष्ट प्रवाहातच त्या सापडत आहेत की काय,...

रवींद्र शोभणे : मनिषा साधू यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशननागपूर : साधारणत: लेखिका स्त्रीवादी झाल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या एका विशिष्ट प्रवाहातच त्या सापडत आहेत की काय,असा प्रश्न निर्माण होत असताना आखाती देशात पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि शोषणाबाबत लिहिण्याचे धाडस एखाद्या लेखिकेने दाखवावे, ही साहित्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. भारतातून कामाच्या निमित्ताने अनेक पुरुष बायका-पोर व देश सोडून आखाती देशात जातात. पण तेथे या पुरुषांसोबत कसे वर्तन केले जाते, त्यांना कुठल्या शोषणाला सामोरे जावे लागते आणि यातून त्यांची स्थिती आणि मानसिकता कशी होते, याचे विवेचन करणारी कादंबरीच मनिषा साधू यांनी लिहिली असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही कादंबरी झाली असल्याचे मत कादंबरीकार रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.मनिषा साधू यांच्या पुरुषांच्या देशात ही कादंबरी, सटवाई आणि मुक्त मी हे मराठी कवितासंग्रह आणि ‘सांवला चांद’ हा हिंदी कवितासंग्रह शुक्रवारी डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रवींद्र शोभणे बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब उपाध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राष्ट्रभाषा संकुलातील संवाद कक्षात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शोभणे म्हणाले, लेखनावर कुणाचाही आणि स्वत:चाही निर्बंध नसावा. अनुभवांना लेखनातून अभिव्यक्त होणे गरजेचे आहे, तेच खरे अस्सल लेखन असते. ज्याचे अनुभव समृद्ध असतात तो लेखनातून ते मांडतो. साहित्य क्षेत्रात कोण कुणाच्या पाठीत सुरा खुपसेल ते सांगता येत नाही. स्वत:चेच लेखन सरस आणि इतरांचे दुय्यम मानणाराही एक वर्ग आहे. पण अशा लोकांना न घाबरता आपली अभिव्यक्ती लेखनातून करीत राहणे, हेच लेखकाचे कर्तव्य आहे. सध्या महिला पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने लिहित असल्या तरी स्त्रीवादाच्या चक्रात साचल्यागत होत आहेत. आपला आवाका वाढवून नवनव्या विषयांना भिडण्याचे सामर्थ्य लेखिकांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्यात सभ्य-असभ्य, श्लील-अश्लील असे काहीच नसते. ती त्या कथावस्तूची मागणी असते. पण आपल्याकडे मात्र अशा लेखनाला हिणवले जाते आणि केस पांढरे झाल्यावरच त्याचा उदोउदोही केला जातो, असे ते म्हणाले. गिरीश गांधी म्हणाले, काही चर्चासत्रातून कुणी बुद्धिवंत ठरत नाही. लेखक हा वाचक आणि समीक्षक रसिकांच्या भट्टीतून तावून सुलाखून निघतो त्यानंतरच त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. यासंदर्भात वैदर्भीय उदारमतवादी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)