शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नागपुरात भेसळयुक्त ९२ हजारांचे खाद्यतेल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:01 IST

सणासुदीत भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. जास्त भाव देऊनही फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांची ओरड वाढली आहे. त्यामुळे बाजारात शासनातर्फे तेल आणि खाद्यान्नाची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने इतवारीतील एका खाद्यतेल विक्रेत्याचे दुकान आणि गोदामावर धाड टाकून भेसळयुक्त ९२ हजार रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई : धडक मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क     नागपूर : सणासुदीत भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. जास्त भाव देऊनही फसवणूक होत असल्यामुळे ग्राहकांची ओरड वाढली आहे. त्यामुळे बाजारात शासनातर्फे तेल आणि खाद्यान्नाची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने इतवारीतील एका खाद्यतेल विक्रेत्याचे दुकान आणि गोदामावर धाड टाकून भेसळयुक्त ९२ हजार रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अभय देशपांडे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २९ आॅक्टोबरला नेहरू पुतळा, तेलीपुरा, इतवारी येथील न्यू लक्ष्मी आॅईल स्टोअर्समध्ये आणि गोदामावर एकाचवेळी धाड टाकली. स्टोअर्सचे मालक वासुदेव खंडवानी हे नामांकित कंपनी फॉर्च्युन, किंंग्ज, आधार या कंपनीचे रिकामे टीन खरेदी करून त्यामध्ये निम्न प्रतिचे आणि भेसळयुक्त खाद्यतेल भरून त्यावर बनावट टिकलीद्वारे सिलपॅक करीत होते. खाद्यतेल नामांकित कंपनीचे असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करून खाद्यतेलाची विक्री करीत असल्याचे आढळून आले.स्टोअर्समधून १६,९४८ रुपये किमतीचे २०८ किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल (खुले), १३,२६९ रुपये किमतीचे १२ टीन (प्रति टीन १५ किलो) रिफाईन्ड सोयाबीन तेल (किंग्ज), ६१,९२० रुपये किमतीचे ४६ टीन रिफाईन्ड सूर्यफूल तेल (आधार) असे एकूण ९२,०२८ किमताची साठा जप्त करण्यात आला. या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणास्तव घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यात आला आहे. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे नागपूर विभागीय सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे आणि प्रफुल्ल टोपले यांनी केली.सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूरतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास विभागाच्या कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन शशिकांत केकरे यांनी केले आहे.

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग