शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

जागतिक युवा कौशल्य दिन; ‘आयटीआय’मध्ये रचला जातोय कौशल्य विकासाचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:14 IST

जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलाना अनुकूल ठरणारी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) करीत आहे.

ठळक मुद्देउद्योगाला पुरविताहेत कुशल रोजगारविद्यार्थ्यांचा मिळतोय १०० टक्के प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलाना अनुकूल ठरणारी पिढी घडविण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) करीत आहे. उद्योगाचा आत्मा समजल्या जाणारे कारागीर घडविण्यासाठी राज्यात कार्यरत असलेल्या या संस्थांना विद्यार्थ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळतो आहे.सद्यस्थितीत पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्याचबरोबर तांत्रिक व्यावसायिक शिक्षण महागडे झाले आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) रोजगार व स्वयंरोजगारासाठी वरदान ठरत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात विविध स्वरूपातील तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारचे मेक इन इंडिया व महाराष्ट्र सरकारचे मेक इन महाराष्ट्रासारख्या उद्योग व सेवा क्षेत्रांसाठी प्रोत्साहन योजनांमुळे अधिक प्रमाण उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास होत आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. ४६ टक्केहून अधिक तरुण आपल्या देशात आहेत, ही संख्या जगाच्या इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच जग भारताकडे कुशल मनुष्य बळासाठी पाहत आहे.उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून यासाठी सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करून देशाच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.आजमितीला राज्यात ४१७ शासकीय व ४०० खासगी आयटीआय आहे. या दोन्ही मध्ये १,३७,३०० जागा आहे. या संस्थांमध्ये एक वर्ष ते दोन वर्षे कालावधीचे विविध ७९ प्रकारचे व्यवसायांचे (अभ्यासक्रम) प्रशिक्षण दिले जाते. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या या संस्थेला गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षी राज्यातील २ लाख ५८ हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.

महिलांनाही मोठी संधीआयटीआय आता पुरुषांचीच मक्तेदारी राहिली नाही. यात महिलांनाही मोठी संधी आहे. आयटीआयमधील एकूण जागेच्या ३० टक्के जागा मुलींसाठी आरक्षित आहे. विशेष म्हणजे अनेक उद्योगांनी स्त्रियांना प्राध्यान्य दिले आहे. त्या सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे.

उद्योगांचा आत्मा घडविणाऱ्या संस्थापूर्वी आयटीआयमध्ये ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा कमी गुणवत्तेचे विद्यार्थी प्रवेश घ्यायचे. पण आज आयटीआयमध्ये शेवटचा विद्यार्थी ६० टक्के गुण मिळविलेला आहे. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. एवढेच नव्हे तर पॉलिटेक्निक व इंजिनीअरींगचे विद्यार्थीसुद्धा आयटीआयमध्ये प्रवेश घेत आहेत. आयटीआयचा अभ्यासक्रम हा उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी बनविलेला असून अभ्यासक्रम बनविताना कारखान्यात वापरल्या जाणाºया कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे कॅम्पस आज आयटीआयमध्ये होत आहे. त्यामुळे आयटीआय खºया अर्थाने उद्योगांचा आत्मा घडविण्याचे कार्य करीत आहे.- हेमंत आवारे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर

मुख्यमंत्री साधणार संवाद

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे पदवीदान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्वत: आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे. याचे लाईव्ह प्रक्षेपण नागपूरच्या आयटीआयमध्येसुद्धा होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान