शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जागतिक वन्यजीव सप्ताह विशेष; १० वर्षांसाठी आखला जातोय स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 07:30 IST

Nagpur News राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन आखला आहे. २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

ठळक मुद्देवन्यजीव व्यवस्थापनासाठी राज्य वनविभागाचे पाऊलमुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव ठेवणार

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन आखला आहे. २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. (World Wildlife Week Special)

राज्य वन्यजीव सल्लागार समितीची बैठक १२ ऑक्टोबरला होत आहे. मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असून, या बैठकीत त्यांच्यासमोर मंजुरीसाठी हा प्लॅन ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी ‘लोकमत’ला दिली. महाराष्ट्र वनविभागाच्यावतीने राबविला जाणारा हा पहिलाच ॲक्शन प्लॅन असून, यात विशेषत्वाने वन आणि वन्यजीव व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. केंद्रीय वनविभागाकडून देशपातळीवर आजवर अशा तीन कृती योजना (ॲक्शन प्लॅन) आखण्यात आल्या असून, २०१७ मध्ये आलेला तिसरा प्लॅन सध्या राबविला जात आहे. तो २०२७ पर्यंत चालणार आहे.

लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनव्यवस्थापन राखताना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यावर या १० वर्षांच्या काळात ठोस उपाययोजना केली जाईल. जंगलांचे रक्षण, लोकांचे जंगलावरील अवलंबन कमी करणे, पर्यायी सक्षम रोजगार देणे, पर्यावरण राखणे, ‘फ्री लग्ज’ म्हणून जंगलाचा वापर करण्यासाठी योजना आखणे, वनसंशोधन करणे, लोकसहभाग वाढविणे यासह अनेक बाबींचा यात समावेश आहे.

राज्यातील जंगलात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत असमतोल आहे. चंद्रपुरात वाघ, तर मुंबईत बिबटे अधिक आहेत. नवेगाव, कोल्हापुरात वाघ कमी आहेत. यासाठी वाघांचे ट्रान्सलोकेड करण्याचेही नियोजन यात आहे.

१० नवीन राखीव संवर्धन क्षेत्र प्रस्तावित

भौगोलिक क्षेत्रात ३३ टक्के जंगल, किमान ५ टक्के संरक्षित क्षेत्र असावे लागते. सध्या राज्यात ५० अभयारण्ये, ६ नॅशनल पार्क आणि १५ संरक्षित क्षेत्र आहेत. नव्याने १० नवीन राखीव संवर्धन क्षेत्र करण्याचे नियोजन असून, प्रस्ताव तयार करणे व माहिती गोळा करणे सुरू आहे. विशेषत: राज्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची ठिकाणे राखीव संवर्धन करण्याची योजना आहे.

...

टॅग्स :wildlifeवन्यजीव