शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जागतिक वन्यजीव सप्ताह विशेष; १० वर्षांसाठी आखला जातोय स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 07:30 IST

Nagpur News राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन आखला आहे. २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

ठळक मुद्देवन्यजीव व्यवस्थापनासाठी राज्य वनविभागाचे पाऊलमुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव ठेवणार

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन आखला आहे. २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. (World Wildlife Week Special)

राज्य वन्यजीव सल्लागार समितीची बैठक १२ ऑक्टोबरला होत आहे. मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असून, या बैठकीत त्यांच्यासमोर मंजुरीसाठी हा प्लॅन ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी ‘लोकमत’ला दिली. महाराष्ट्र वनविभागाच्यावतीने राबविला जाणारा हा पहिलाच ॲक्शन प्लॅन असून, यात विशेषत्वाने वन आणि वन्यजीव व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. केंद्रीय वनविभागाकडून देशपातळीवर आजवर अशा तीन कृती योजना (ॲक्शन प्लॅन) आखण्यात आल्या असून, २०१७ मध्ये आलेला तिसरा प्लॅन सध्या राबविला जात आहे. तो २०२७ पर्यंत चालणार आहे.

लिमये यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनव्यवस्थापन राखताना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यावर या १० वर्षांच्या काळात ठोस उपाययोजना केली जाईल. जंगलांचे रक्षण, लोकांचे जंगलावरील अवलंबन कमी करणे, पर्यायी सक्षम रोजगार देणे, पर्यावरण राखणे, ‘फ्री लग्ज’ म्हणून जंगलाचा वापर करण्यासाठी योजना आखणे, वनसंशोधन करणे, लोकसहभाग वाढविणे यासह अनेक बाबींचा यात समावेश आहे.

राज्यातील जंगलात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत असमतोल आहे. चंद्रपुरात वाघ, तर मुंबईत बिबटे अधिक आहेत. नवेगाव, कोल्हापुरात वाघ कमी आहेत. यासाठी वाघांचे ट्रान्सलोकेड करण्याचेही नियोजन यात आहे.

१० नवीन राखीव संवर्धन क्षेत्र प्रस्तावित

भौगोलिक क्षेत्रात ३३ टक्के जंगल, किमान ५ टक्के संरक्षित क्षेत्र असावे लागते. सध्या राज्यात ५० अभयारण्ये, ६ नॅशनल पार्क आणि १५ संरक्षित क्षेत्र आहेत. नव्याने १० नवीन राखीव संवर्धन क्षेत्र करण्याचे नियोजन असून, प्रस्ताव तयार करणे व माहिती गोळा करणे सुरू आहे. विशेषत: राज्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची ठिकाणे राखीव संवर्धन करण्याची योजना आहे.

...

टॅग्स :wildlifeवन्यजीव