शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विश्व जल दिन ; ...तर चार व्यक्तींच्या कुटुंबाला पाण्याचे बिल येईल ५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 07:00 IST

Nagpur news चार व्यक्तींचे कुटुंब असेल तर बिल होईल ४ लाख ३२ हजार रुपये. म्हणजे ५ लाखांची तजवीज करून ठेवावीच लागेल.

ठळक मुद्दे७३ वर्षात उपलब्धता ६००० वरून १५०० क्युबिक मीटरपाण्याची किंमत समजून घ्या

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शहरातील नागरिक पाण्याचे बिल भरत असले तरी भरभरून वाहणारे पाणी पाहून आपल्याला पाण्याची किंमत समजणार नाही. मात्र प्रवासात तहान लागल्यानंतर २० रुपयांची पाणी बॉटल घेतली की ती पटकन लक्षात येते. एक व्यक्ती दिवसभरात १०० ते १५० लिटर पाणी वापरतो. महिन्याला जवळपास ४५०० लिटर आणि वर्षाला ५४,००० लिटर लागते. हेच पाणी किमान २ रुपये लिटरने बाजारातून विकत घेतले तर बिल असेल १ लाख ८ हजार रुपये. चार व्यक्तींचे कुटुंब असेल तर बिल होईल ४ लाख ३२ हजार रुपये. म्हणजे ५ लाखांची तजवीज करून ठेवावीच लागेल.

आता ही परिस्थिती येण्यामागची सद्यस्थिती जाणून घ्या. केंद्रीय भूजल सर्वेक्षण मंडळ (सीजीडब्ल्यूबी) च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या भूजलपातळीत वाढ झाली असली तरी देशात गेल्या १० वर्षांत त्यात सातत्याने किंचित घटही नोंदविण्यात येत आहे. दुसऱ्या अर्थाने, स्वातंत्र्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेचा रेकॉर्ड पाहिला तर १९४७ साली देशात प्रत्येक व्यक्तीला वापरण्यासाठी ६००० क्युबिक मीटर पाणी उपलब्ध होते, जे २०२० मध्ये केवळ १५०० घनमीटर उपलब्ध आहे. २०५० मध्ये ते केवळ १००० घन मीटर राहील, असा भीतिदायक अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात ४३१.८६ बीसीएम पाणी संचयित होते व उपसा करण्यालायक ३९२.७७ बीसीएम आहे. ज्यामध्ये गेल्या काही वर्षांत थोडी थोडी घट झाली आहे. विशेष म्हणजे भूजलातून २०१३ मध्ये २३१ बीसीएम पाण्याचा उपसा झाला होता. २०१७ मध्ये २४८.६९ बीसीएमची नोंद करण्यात आली आहे. यातील ८० ते ८५ टक्के उपसा शेतीसाठी तर उर्वरित १५ टक्के मानवी वापर व उद्योगासाठी केला जातो. उद्योगधंद्यासाठी पाण्याची गरज वाढली असल्याने भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असलेल्या उपलब्ध पाण्यापैकी मानवी वापरासाठी किती मिळेल आणि वर नमूद केलेल्या किमतीनुसार विकत घ्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्यातरी महाराष्ट्र सुरक्षित

२०१८-१९ मध्ये सीजीडब्ल्यूबीचे सर्वेक्षण

- महाराष्ट्रात ३१५ ब्लॉकपैकी २७१ ब्लॉक सुरक्षित. ९ ब्लॉक अतिधोकादायक, ६० किंचित धोकादायक. ११ मध्ये अतिउपसा.

- नागपूर जिल्ह्यातील काटोल व सावनेर, अमरावतीमध्ये अमरावती, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी व वरूडचा समावेश आहे.

- राज्यात २०१३ मध्ये ३३.१९ बीसीएम पाणी उपलब्ध होते, जे २०१७ मध्ये ३१.६४ बीसीएम राहिले.

- गेल्या वर्षी नोंद होणाऱ्या ३२,७६९ विहिरींपैकी २०,७५४ विहिरींमध्ये पाण्याच्या पातळीत ६७ टक्के वाढ.

- मराठवाडा व इतर काही ठिकाणच्या ४,१६४ विहिरींच्या पाण्यात घट तर १,४२७ विहिरीत अतिघट नोंदविण्यात आली.

टॅग्स :Waterपाणी