शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
4
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
5
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
6
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
7
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
8
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
9
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
10
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
12
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
13
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
14
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
15
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
16
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
17
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
18
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
19
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
20
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर

विश्व जल दिन ; ...तर चार व्यक्तींच्या कुटुंबाला पाण्याचे बिल येईल ५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 07:00 IST

Nagpur news चार व्यक्तींचे कुटुंब असेल तर बिल होईल ४ लाख ३२ हजार रुपये. म्हणजे ५ लाखांची तजवीज करून ठेवावीच लागेल.

ठळक मुद्दे७३ वर्षात उपलब्धता ६००० वरून १५०० क्युबिक मीटरपाण्याची किंमत समजून घ्या

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शहरातील नागरिक पाण्याचे बिल भरत असले तरी भरभरून वाहणारे पाणी पाहून आपल्याला पाण्याची किंमत समजणार नाही. मात्र प्रवासात तहान लागल्यानंतर २० रुपयांची पाणी बॉटल घेतली की ती पटकन लक्षात येते. एक व्यक्ती दिवसभरात १०० ते १५० लिटर पाणी वापरतो. महिन्याला जवळपास ४५०० लिटर आणि वर्षाला ५४,००० लिटर लागते. हेच पाणी किमान २ रुपये लिटरने बाजारातून विकत घेतले तर बिल असेल १ लाख ८ हजार रुपये. चार व्यक्तींचे कुटुंब असेल तर बिल होईल ४ लाख ३२ हजार रुपये. म्हणजे ५ लाखांची तजवीज करून ठेवावीच लागेल.

आता ही परिस्थिती येण्यामागची सद्यस्थिती जाणून घ्या. केंद्रीय भूजल सर्वेक्षण मंडळ (सीजीडब्ल्यूबी) च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या भूजलपातळीत वाढ झाली असली तरी देशात गेल्या १० वर्षांत त्यात सातत्याने किंचित घटही नोंदविण्यात येत आहे. दुसऱ्या अर्थाने, स्वातंत्र्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेचा रेकॉर्ड पाहिला तर १९४७ साली देशात प्रत्येक व्यक्तीला वापरण्यासाठी ६००० क्युबिक मीटर पाणी उपलब्ध होते, जे २०२० मध्ये केवळ १५०० घनमीटर उपलब्ध आहे. २०५० मध्ये ते केवळ १००० घन मीटर राहील, असा भीतिदायक अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात ४३१.८६ बीसीएम पाणी संचयित होते व उपसा करण्यालायक ३९२.७७ बीसीएम आहे. ज्यामध्ये गेल्या काही वर्षांत थोडी थोडी घट झाली आहे. विशेष म्हणजे भूजलातून २०१३ मध्ये २३१ बीसीएम पाण्याचा उपसा झाला होता. २०१७ मध्ये २४८.६९ बीसीएमची नोंद करण्यात आली आहे. यातील ८० ते ८५ टक्के उपसा शेतीसाठी तर उर्वरित १५ टक्के मानवी वापर व उद्योगासाठी केला जातो. उद्योगधंद्यासाठी पाण्याची गरज वाढली असल्याने भविष्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असलेल्या उपलब्ध पाण्यापैकी मानवी वापरासाठी किती मिळेल आणि वर नमूद केलेल्या किमतीनुसार विकत घ्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्यातरी महाराष्ट्र सुरक्षित

२०१८-१९ मध्ये सीजीडब्ल्यूबीचे सर्वेक्षण

- महाराष्ट्रात ३१५ ब्लॉकपैकी २७१ ब्लॉक सुरक्षित. ९ ब्लॉक अतिधोकादायक, ६० किंचित धोकादायक. ११ मध्ये अतिउपसा.

- नागपूर जिल्ह्यातील काटोल व सावनेर, अमरावतीमध्ये अमरावती, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी व वरूडचा समावेश आहे.

- राज्यात २०१३ मध्ये ३३.१९ बीसीएम पाणी उपलब्ध होते, जे २०१७ मध्ये ३१.६४ बीसीएम राहिले.

- गेल्या वर्षी नोंद होणाऱ्या ३२,७६९ विहिरींपैकी २०,७५४ विहिरींमध्ये पाण्याच्या पातळीत ६७ टक्के वाढ.

- मराठवाडा व इतर काही ठिकाणच्या ४,१६४ विहिरींच्या पाण्यात घट तर १,४२७ विहिरीत अतिघट नोंदविण्यात आली.

टॅग्स :Waterपाणी