शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुद्ध जयंतीनिमित्त नागपुरात जागतिक शांती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९ आणि २० मे रोजी आयोजन जगभरातील बौद्ध विचारवंत करणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह आणि दीक्षाभूमी येथे आयोजित या परिषदेत विविध देशांमधील बौद्ध भिक्खू आणि विचारवंत शांततेवर मंथन करतील.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंबंधात माहिती दिली. १९ मे रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे या परिषदेचा उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रमुख अतिथी राहतील.दोन दिवसीय या परिषदेत महाबोधी सोसायटी श्रीलंकाचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, वारसानबोधी (बांगलादेश), वाई पुनाला (म्यानमार), डॉ. पोरनी चाईपिनीयापांग (थायलंड), भदंत सदानंद महास्थवीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रा. सुखदेव थोरात, संतोष दास (इंग्लंड), मिथीरीनी चौधरी (बांगलादेश), राजकन्या सौरमा किरतारका (कंबोडिया), राजकुमार थानोरा नॉर्डम (कंबोडिया), राजकुमारी मारीया अमोर (फिलिपाईन्स) आदी विचार व्यक्त करतील.

राहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी विश्वशांती पदयात्रा१९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता राहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी येथे विश्वशांती पदयात्रा काढण्यात येईल. यानंतर दीक्षाभूमीवर दोन्ही दिवस कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. अंगुलीमाल हे नाटक सादर केले जाईल.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा