शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बुद्ध जयंतीनिमित्त नागपुरात जागतिक शांती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९ आणि २० मे रोजी आयोजन जगभरातील बौद्ध विचारवंत करणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक वैशाख दिवस (बुद्ध जयंतीनिमित्त) राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागातर्फे नागपुरात दोन दिवसीय जागतिक शांतता व समता परिषद आयोजित करण्यात आली आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह आणि दीक्षाभूमी येथे आयोजित या परिषदेत विविध देशांमधील बौद्ध भिक्खू आणि विचारवंत शांततेवर मंथन करतील.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंबंधात माहिती दिली. १९ मे रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे या परिषदेचा उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रमुख अतिथी राहतील.दोन दिवसीय या परिषदेत महाबोधी सोसायटी श्रीलंकाचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, वारसानबोधी (बांगलादेश), वाई पुनाला (म्यानमार), डॉ. पोरनी चाईपिनीयापांग (थायलंड), भदंत सदानंद महास्थवीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रा. सुखदेव थोरात, संतोष दास (इंग्लंड), मिथीरीनी चौधरी (बांगलादेश), राजकन्या सौरमा किरतारका (कंबोडिया), राजकुमार थानोरा नॉर्डम (कंबोडिया), राजकुमारी मारीया अमोर (फिलिपाईन्स) आदी विचार व्यक्त करतील.

राहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी विश्वशांती पदयात्रा१९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता राहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी येथे विश्वशांती पदयात्रा काढण्यात येईल. यानंतर दीक्षाभूमीवर दोन्ही दिवस कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. अंगुलीमाल हे नाटक सादर केले जाईल.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा