शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

जागतिक पक्षाघात दिवस : देशात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:43 IST

World Paralysis Day , Nagpur news पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो.

ठळक मुद्देजगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो. त्यापैकी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. भारतात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराने बळी पडतात. हा आजार कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. देशातील पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण हे ४० वर्ष पेक्षा कमी वयाचे असतात, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने पक्षाघात विषयी जागरूकता वाढविण्यासाठी ‘वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन’ सोबत ‘इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजी’ आणि ‘नागपूर न्यूरो सोसायटी’च्यावतीने तज्ज्ञानी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

जंक फूडचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव व तणाव यामुळे भारतात तरुणामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. शिरीष हस्तक म्हणाले, जेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनी एकतर गाठीद्वारे अवरोधित होते किंवा फुटते तेव्हा पक्षाघात होतो. ८० टक्के रुग्णामध्ये मेंदूची रक्त वाहिनी बंद होते आणि २० टक्के रुग्णांमध्ये रक्त वाहिनी फाटते. स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे. चेहरा तिरपा होणे, हातात कमजोरी येणे व आवाजात फरक पडणे हे पक्षाघाताची प्रमुख लक्षणे आहेत. चालताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे, दृष्टीदोष होणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, गोंधळ होणे इत्यादी पक्षाघाताची इतर लक्षणे आहेत.

 ५० टक्के मृत्यू रोखता येतो

इंडियन अ‍ॅकॅडमी न्यूरोलॉजीचे माझी अध्यक्ष व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, लवकर निदान आणि त्वरित उपचारामुळे ५० टक्के रुग्णात मृत्यू व अपंगत्व रोखता येऊ शकतो. एकदा पक्षाघात झाल्यानंतर चार पैकी एकाला परत पक्षाघात येऊ शकतो, म्हणूनच त्या व्यक्तीने आजीवन औषधे घ्यावीत व जीवनशैलीत बदल करण्यावर भर द्यावा. पुनर्वसन तज्ञ डॉ. अभिषेक श्रीवासत्व म्हणाले, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, वायू प्रदूषण आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी हे ९० टक्के रुग्णामध्ये पक्षाघाता चे कारण असते.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर