शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

जागतिक पक्षाघात दिवस : देशात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:43 IST

World Paralysis Day , Nagpur news पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो.

ठळक मुद्देजगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो. त्यापैकी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. भारतात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराने बळी पडतात. हा आजार कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. देशातील पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण हे ४० वर्ष पेक्षा कमी वयाचे असतात, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने पक्षाघात विषयी जागरूकता वाढविण्यासाठी ‘वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन’ सोबत ‘इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजी’ आणि ‘नागपूर न्यूरो सोसायटी’च्यावतीने तज्ज्ञानी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

जंक फूडचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव व तणाव यामुळे भारतात तरुणामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. शिरीष हस्तक म्हणाले, जेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनी एकतर गाठीद्वारे अवरोधित होते किंवा फुटते तेव्हा पक्षाघात होतो. ८० टक्के रुग्णामध्ये मेंदूची रक्त वाहिनी बंद होते आणि २० टक्के रुग्णांमध्ये रक्त वाहिनी फाटते. स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे. चेहरा तिरपा होणे, हातात कमजोरी येणे व आवाजात फरक पडणे हे पक्षाघाताची प्रमुख लक्षणे आहेत. चालताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे, दृष्टीदोष होणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, गोंधळ होणे इत्यादी पक्षाघाताची इतर लक्षणे आहेत.

 ५० टक्के मृत्यू रोखता येतो

इंडियन अ‍ॅकॅडमी न्यूरोलॉजीचे माझी अध्यक्ष व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, लवकर निदान आणि त्वरित उपचारामुळे ५० टक्के रुग्णात मृत्यू व अपंगत्व रोखता येऊ शकतो. एकदा पक्षाघात झाल्यानंतर चार पैकी एकाला परत पक्षाघात येऊ शकतो, म्हणूनच त्या व्यक्तीने आजीवन औषधे घ्यावीत व जीवनशैलीत बदल करण्यावर भर द्यावा. पुनर्वसन तज्ञ डॉ. अभिषेक श्रीवासत्व म्हणाले, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, वायू प्रदूषण आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी हे ९० टक्के रुग्णामध्ये पक्षाघाता चे कारण असते.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर