शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

जागतिक पक्षाघात दिवस : देशात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 21:43 IST

World Paralysis Day , Nagpur news पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो.

ठळक मुद्देजगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : पक्षाघातामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. पक्षाघात हा अतिशय घातक आजार आहे. जगात दर २ सेकंदाला एकाला पक्षाघात होतो. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना हा आजार होतो. त्यापैकी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशातील असतात. भारतात दर मिनिटाला ६ लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात २० लाख लोक या आजाराने बळी पडतात. हा आजार कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतामध्ये याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. देशातील पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण हे ४० वर्ष पेक्षा कमी वयाचे असतात, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने पक्षाघात विषयी जागरूकता वाढविण्यासाठी ‘वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन’ सोबत ‘इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजी’ आणि ‘नागपूर न्यूरो सोसायटी’च्यावतीने तज्ज्ञानी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

जंक फूडचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव व तणाव यामुळे भारतात तरुणामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. शिरीष हस्तक म्हणाले, जेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनी एकतर गाठीद्वारे अवरोधित होते किंवा फुटते तेव्हा पक्षाघात होतो. ८० टक्के रुग्णामध्ये मेंदूची रक्त वाहिनी बंद होते आणि २० टक्के रुग्णांमध्ये रक्त वाहिनी फाटते. स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे. चेहरा तिरपा होणे, हातात कमजोरी येणे व आवाजात फरक पडणे हे पक्षाघाताची प्रमुख लक्षणे आहेत. चालताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे, दृष्टीदोष होणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, गोंधळ होणे इत्यादी पक्षाघाताची इतर लक्षणे आहेत.

 ५० टक्के मृत्यू रोखता येतो

इंडियन अ‍ॅकॅडमी न्यूरोलॉजीचे माझी अध्यक्ष व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, लवकर निदान आणि त्वरित उपचारामुळे ५० टक्के रुग्णात मृत्यू व अपंगत्व रोखता येऊ शकतो. एकदा पक्षाघात झाल्यानंतर चार पैकी एकाला परत पक्षाघात येऊ शकतो, म्हणूनच त्या व्यक्तीने आजीवन औषधे घ्यावीत व जीवनशैलीत बदल करण्यावर भर द्यावा. पुनर्वसन तज्ञ डॉ. अभिषेक श्रीवासत्व म्हणाले, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, वायू प्रदूषण आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी हे ९० टक्के रुग्णामध्ये पक्षाघाता चे कारण असते.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर