शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : स्वादिष्ट संत्र्याच्या हलव्याने वाढविला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:12 IST

नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड  ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे ‘हलव्या’ने स्वागतविक्रम शेतकऱ्यांना समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड  ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली. सर्वांनी स्वादिष्ट हलव्याचा स्वाद घेऊन आनंद व्यक्त केला आहे. संत्र्यापासून हलवा तयार करता येऊ शकतो, याबद्दल विष्णू मनोहर यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. या निमित्ताने त्यांच्या जागतिक विक्रमाच्या यादीत आणखी एक भर पडली. हा विक्रम शेतकरी बांधवांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया विष्णू मनोहर यांनी दिली.विष्णू मनोहर यांनी संत्र्यापासून हलवा तयार करण्याची प्रक्रिया दुपारी ४ वाजता सुरू केली. एक-एक वस्तू १२० किलो वजनाच्या अ‍ॅल्युमिनियमच्या कढईत टाकत असताना उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता. हलवा तयार करण्यासाठी २५०० संत्री, ५० किलो रवा, ५० किलो साखर, १५० किलो  ऑरेंज क्रॅश (साखर व संत्र्याचा रसापासून तयार केलेला पाक), ५० किलो शुद्ध तूप, ५० लिटर दूध, १० किलो काजू आदी सामग्रीचा उपयोग करण्यात आला. दीड तासानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास हलवा तयार झाला. त्यावेळी मंडपात हलव्याचा सुवास दळवळत होता. प्रत्येकजण चव चाखण्यासाठी आतूर होता. यादरम्यान सर्वांना हलवा तयार करण्याची प्रक्रिया मनोहर यांनी महिलांना समजावून सांगितली. संत्र्याच्या उपयोग करून चविष्ट हलवासुद्धा तयार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अशा पाककृतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार : विष्णू मनोहरमहिलांनी संत्र्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पाककृती तयार कराव्यात. यामुळे संत्र्याची विक्री वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल. संत्र्याच्या सालीपासूनही विविध पदार्थ तयार करता येतात. अशा इव्हेंटमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. या उपक्रमासाठी विष्णू मनोहर यांची २५ जणांची चमू कार्यरत होती. त्यांना सखी मंचच्या सदस्या, विजय जथे, प्रफुल्ल देशकर, प्रवीण सिंग, अश्विन ढोमणे, सुचिता सहस्त्रभोजनी, अपर्णा मनोहर, दिपाली ढोमणे, वसुंधरा मनोहर, तनुजा मनोहर यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरVishnu Manoharविष्णु मनोहर