शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : स्वादिष्ट संत्र्याच्या हलव्याने वाढविला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:12 IST

नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड  ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे ‘हलव्या’ने स्वागतविक्रम शेतकऱ्यांना समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड  ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली. सर्वांनी स्वादिष्ट हलव्याचा स्वाद घेऊन आनंद व्यक्त केला आहे. संत्र्यापासून हलवा तयार करता येऊ शकतो, याबद्दल विष्णू मनोहर यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. या निमित्ताने त्यांच्या जागतिक विक्रमाच्या यादीत आणखी एक भर पडली. हा विक्रम शेतकरी बांधवांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया विष्णू मनोहर यांनी दिली.विष्णू मनोहर यांनी संत्र्यापासून हलवा तयार करण्याची प्रक्रिया दुपारी ४ वाजता सुरू केली. एक-एक वस्तू १२० किलो वजनाच्या अ‍ॅल्युमिनियमच्या कढईत टाकत असताना उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता. हलवा तयार करण्यासाठी २५०० संत्री, ५० किलो रवा, ५० किलो साखर, १५० किलो  ऑरेंज क्रॅश (साखर व संत्र्याचा रसापासून तयार केलेला पाक), ५० किलो शुद्ध तूप, ५० लिटर दूध, १० किलो काजू आदी सामग्रीचा उपयोग करण्यात आला. दीड तासानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास हलवा तयार झाला. त्यावेळी मंडपात हलव्याचा सुवास दळवळत होता. प्रत्येकजण चव चाखण्यासाठी आतूर होता. यादरम्यान सर्वांना हलवा तयार करण्याची प्रक्रिया मनोहर यांनी महिलांना समजावून सांगितली. संत्र्याच्या उपयोग करून चविष्ट हलवासुद्धा तयार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अशा पाककृतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार : विष्णू मनोहरमहिलांनी संत्र्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पाककृती तयार कराव्यात. यामुळे संत्र्याची विक्री वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल. संत्र्याच्या सालीपासूनही विविध पदार्थ तयार करता येतात. अशा इव्हेंटमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. या उपक्रमासाठी विष्णू मनोहर यांची २५ जणांची चमू कार्यरत होती. त्यांना सखी मंचच्या सदस्या, विजय जथे, प्रफुल्ल देशकर, प्रवीण सिंग, अश्विन ढोमणे, सुचिता सहस्त्रभोजनी, अपर्णा मनोहर, दिपाली ढोमणे, वसुंधरा मनोहर, तनुजा मनोहर यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरVishnu Manoharविष्णु मनोहर