शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

अहिंसा व शांतीसाठी जगाला बुद्धाची गरज

By admin | Updated: October 25, 2015 03:09 IST

जगात शांती, अहिंसा व सद्भाव स्थापन व्हावा यासाठी बुद्ध आणि बुद्धांचे विचार स्वीकारण्याची गरज आहे. जगाला याची गरज पटू लागली आहे.

नागपूर : जगात शांती, अहिंसा व सद्भाव स्थापन व्हावा यासाठी बुद्ध आणि बुद्धांचे विचार स्वीकारण्याची गरज आहे. जगाला याची गरज पटू लागली आहे. त्यामुळे जगभरात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार गतीने होत आहे, असे प्रतिपादन जपानमधील ताशियो विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीजचे असोसिएट प्रो. डॉ. वेन ग्योदाई कीयुची यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरूअसलेल्या डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप झाला. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. ‘मॉडर्न डे बुद्धिझम अ‍ॅण्ड प्रेझेंट डे रिलेवंट’ या विषयावर बोलताना डॉ. कीयुची म्हणाले, जागतिक मंदीच्या काळात जगातील अनेक देशांसोबतच जपानमध्ये सुद्धा अर्थिक मंदी होती. त्या दरम्यान जपानला सावरण्यात बुद्ध तत्त्वज्ञानाचे मोठे योगदान राहिले. जपानच्या अर्थव्यवस्थेत त्याचा प्रभाव आहे. या कारणामुळेच जपानमध्ये मोठ्या संख्येने लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. मागील काही वर्षात जपानमध्ये एका मागोमाग एक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या घटना घडत आहेत. त्याचा सामना करण्यात तेथील बौद्ध भिक्षुंनी कुठलाही स्वार्थ न बाळगता महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच जपान आपत्तींचा सामना मजबुतीने करू शकला. या नि:स्वार्थ सेवाभावाने जगासमोर एक चांगले उदाहरण सादर केले आहे. डॉ. कीयुची यांनी जपानी भाषेत मार्गदर्शन केले. त्याचे हिंदी भाषांतर भदंत संघरत्न माणके यांनी केले. जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)