शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

अहिंसा व शांतीसाठी जगाला बुद्धाची गरज

By admin | Updated: October 25, 2015 03:09 IST

जगात शांती, अहिंसा व सद्भाव स्थापन व्हावा यासाठी बुद्ध आणि बुद्धांचे विचार स्वीकारण्याची गरज आहे. जगाला याची गरज पटू लागली आहे.

नागपूर : जगात शांती, अहिंसा व सद्भाव स्थापन व्हावा यासाठी बुद्ध आणि बुद्धांचे विचार स्वीकारण्याची गरज आहे. जगाला याची गरज पटू लागली आहे. त्यामुळे जगभरात बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार गतीने होत आहे, असे प्रतिपादन जपानमधील ताशियो विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीजचे असोसिएट प्रो. डॉ. वेन ग्योदाई कीयुची यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरूअसलेल्या डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप झाला. प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. ‘मॉडर्न डे बुद्धिझम अ‍ॅण्ड प्रेझेंट डे रिलेवंट’ या विषयावर बोलताना डॉ. कीयुची म्हणाले, जागतिक मंदीच्या काळात जगातील अनेक देशांसोबतच जपानमध्ये सुद्धा अर्थिक मंदी होती. त्या दरम्यान जपानला सावरण्यात बुद्ध तत्त्वज्ञानाचे मोठे योगदान राहिले. जपानच्या अर्थव्यवस्थेत त्याचा प्रभाव आहे. या कारणामुळेच जपानमध्ये मोठ्या संख्येने लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. मागील काही वर्षात जपानमध्ये एका मागोमाग एक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या घटना घडत आहेत. त्याचा सामना करण्यात तेथील बौद्ध भिक्षुंनी कुठलाही स्वार्थ न बाळगता महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच जपान आपत्तींचा सामना मजबुतीने करू शकला. या नि:स्वार्थ सेवाभावाने जगासमोर एक चांगले उदाहरण सादर केले आहे. डॉ. कीयुची यांनी जपानी भाषेत मार्गदर्शन केले. त्याचे हिंदी भाषांतर भदंत संघरत्न माणके यांनी केले. जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)