शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जागतिक कावीळ दिन; निदानात उशीर झाल्यास मृत्यूचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 07:45 IST

Nagpur Newsकावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी दिली.

ठळक मुद्दे उपचारात अनेक गैरसमज योग्य वेळीच निदान व उपचार आवश्यक

नागपूर : आपल्याकडे कावीळच्या (जॉन्डिस) उपचाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. ‘हिपॅटायटीस’चा ‘ए’ व ‘ई’ विषाणूमुळे होणारा कावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती जागतिक कावीळ दिनाच्या निमित्ताने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी ‘लोकमत’ला दिली.

-डोळे पिवळे होणे हे आजाराचे लक्षण

डॉ. समर्थ म्हणाले, कावीळ आजार नाही. डोळे पिवळे होणे, ताप व छातीत दुखणे ही काही लक्षणे दिसून येतात. याचे कारण वेगवेगळे असू शकतात. यामुळे तपासणी व उपचारही वेगवेगळे असतात. ‘हिपॅटायटीस’चा विषाणू ‘ई’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’मुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे कारण ठरते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, टायफाॅइड, लिव्हर, एबसेस, टीबी आणि ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’चेही कावीळ कारण ठरू शकते. यासाठी काही तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.

-लांब कालावधीचा कावीळ धोकादायक

ज्यांना लांब अवधीपर्यंत कावीळ असेल आणि सोबतच पोटात ‘फ्ल्यूड’, रक्ताची उलटी किंवा शौचातून रक्त जात असेल तर तत्काळ तपासणी गरजेची असते.

-सुरुवातीच्या टप्प्यातच निदान आवश्यक

कावीळ हा लक्षण आधारित आजार आहे. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान होणे, त्याच्या लक्षणांच्या आधारावर उपचार होणे आवश्यक ठरते. ‘हिपॅटायटीस बी’ आणि ‘सी’च्या व्हायरल इन्फेक्शन तत्काळ निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण यावर योग्य उपचार आहे. दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन इन्फेक्शनचे आणि साेयरोसीस किंवा लिव्हर कॅन्सरचे कारण ठरू शकते. ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘ए’ला लसीकरणाद्वारे टाळता येते. ‘सी’ आणि ‘ई’ व्हायरसवर अद्यापही लस उपलब्ध नाही.

-कावीळच्या रुग्णांनी घरचाच आहार घ्यावा

कावीळच्या रुग्णांनी घरीच तयार केलेला आहार घ्यावा. जास्त तेल व मसाल्याचे पदार्थ टाळावे. दूध, ताक, दही याचा आहारात समावेश करावा. रुग्णाला थोडा-थोडा आहार देत राहायला हवे. ‘हिपॅटायटीस ए’ व ‘ई’च्या रुग्णांनी आजार असेपर्यंत स्वयंपाकगृहात जाऊ नये. आजार पसरण्याचा धोका असतो.

- उपचारच नाही हा गैरसमज

डॉ. समर्थ म्हणाले, कावीळवर उपचारच नाही हा एक गैरसमज आहे. आजाराच्या कारणांवर उपचार अवलंबून असतो. स्वयंघोषित डॉक्टर किंवा अप्रमाणित हर्बल औषधांना टाळायला हवे.

टॅग्स :Healthआरोग्य