शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कावीळ दिन; निदानात उशीर झाल्यास मृत्यूचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 07:45 IST

Nagpur Newsकावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी दिली.

ठळक मुद्दे उपचारात अनेक गैरसमज योग्य वेळीच निदान व उपचार आवश्यक

नागपूर : आपल्याकडे कावीळच्या (जॉन्डिस) उपचाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. ‘हिपॅटायटीस’चा ‘ए’ व ‘ई’ विषाणूमुळे होणारा कावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती जागतिक कावीळ दिनाच्या निमित्ताने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी ‘लोकमत’ला दिली.

-डोळे पिवळे होणे हे आजाराचे लक्षण

डॉ. समर्थ म्हणाले, कावीळ आजार नाही. डोळे पिवळे होणे, ताप व छातीत दुखणे ही काही लक्षणे दिसून येतात. याचे कारण वेगवेगळे असू शकतात. यामुळे तपासणी व उपचारही वेगवेगळे असतात. ‘हिपॅटायटीस’चा विषाणू ‘ई’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’मुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे कारण ठरते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, टायफाॅइड, लिव्हर, एबसेस, टीबी आणि ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’चेही कावीळ कारण ठरू शकते. यासाठी काही तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.

-लांब कालावधीचा कावीळ धोकादायक

ज्यांना लांब अवधीपर्यंत कावीळ असेल आणि सोबतच पोटात ‘फ्ल्यूड’, रक्ताची उलटी किंवा शौचातून रक्त जात असेल तर तत्काळ तपासणी गरजेची असते.

-सुरुवातीच्या टप्प्यातच निदान आवश्यक

कावीळ हा लक्षण आधारित आजार आहे. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान होणे, त्याच्या लक्षणांच्या आधारावर उपचार होणे आवश्यक ठरते. ‘हिपॅटायटीस बी’ आणि ‘सी’च्या व्हायरल इन्फेक्शन तत्काळ निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण यावर योग्य उपचार आहे. दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन इन्फेक्शनचे आणि साेयरोसीस किंवा लिव्हर कॅन्सरचे कारण ठरू शकते. ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘ए’ला लसीकरणाद्वारे टाळता येते. ‘सी’ आणि ‘ई’ व्हायरसवर अद्यापही लस उपलब्ध नाही.

-कावीळच्या रुग्णांनी घरचाच आहार घ्यावा

कावीळच्या रुग्णांनी घरीच तयार केलेला आहार घ्यावा. जास्त तेल व मसाल्याचे पदार्थ टाळावे. दूध, ताक, दही याचा आहारात समावेश करावा. रुग्णाला थोडा-थोडा आहार देत राहायला हवे. ‘हिपॅटायटीस ए’ व ‘ई’च्या रुग्णांनी आजार असेपर्यंत स्वयंपाकगृहात जाऊ नये. आजार पसरण्याचा धोका असतो.

- उपचारच नाही हा गैरसमज

डॉ. समर्थ म्हणाले, कावीळवर उपचारच नाही हा एक गैरसमज आहे. आजाराच्या कारणांवर उपचार अवलंबून असतो. स्वयंघोषित डॉक्टर किंवा अप्रमाणित हर्बल औषधांना टाळायला हवे.

टॅग्स :Healthआरोग्य