शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

जागतिक कावीळ दिन; निदानात उशीर झाल्यास मृत्यूचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 07:45 IST

Nagpur Newsकावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी दिली.

ठळक मुद्दे उपचारात अनेक गैरसमज योग्य वेळीच निदान व उपचार आवश्यक

नागपूर : आपल्याकडे कावीळच्या (जॉन्डिस) उपचाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. ‘हिपॅटायटीस’चा ‘ए’ व ‘ई’ विषाणूमुळे होणारा कावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती जागतिक कावीळ दिनाच्या निमित्ताने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी ‘लोकमत’ला दिली.

-डोळे पिवळे होणे हे आजाराचे लक्षण

डॉ. समर्थ म्हणाले, कावीळ आजार नाही. डोळे पिवळे होणे, ताप व छातीत दुखणे ही काही लक्षणे दिसून येतात. याचे कारण वेगवेगळे असू शकतात. यामुळे तपासणी व उपचारही वेगवेगळे असतात. ‘हिपॅटायटीस’चा विषाणू ‘ई’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’मुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे कारण ठरते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, टायफाॅइड, लिव्हर, एबसेस, टीबी आणि ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’चेही कावीळ कारण ठरू शकते. यासाठी काही तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.

-लांब कालावधीचा कावीळ धोकादायक

ज्यांना लांब अवधीपर्यंत कावीळ असेल आणि सोबतच पोटात ‘फ्ल्यूड’, रक्ताची उलटी किंवा शौचातून रक्त जात असेल तर तत्काळ तपासणी गरजेची असते.

-सुरुवातीच्या टप्प्यातच निदान आवश्यक

कावीळ हा लक्षण आधारित आजार आहे. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान होणे, त्याच्या लक्षणांच्या आधारावर उपचार होणे आवश्यक ठरते. ‘हिपॅटायटीस बी’ आणि ‘सी’च्या व्हायरल इन्फेक्शन तत्काळ निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण यावर योग्य उपचार आहे. दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन इन्फेक्शनचे आणि साेयरोसीस किंवा लिव्हर कॅन्सरचे कारण ठरू शकते. ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘ए’ला लसीकरणाद्वारे टाळता येते. ‘सी’ आणि ‘ई’ व्हायरसवर अद्यापही लस उपलब्ध नाही.

-कावीळच्या रुग्णांनी घरचाच आहार घ्यावा

कावीळच्या रुग्णांनी घरीच तयार केलेला आहार घ्यावा. जास्त तेल व मसाल्याचे पदार्थ टाळावे. दूध, ताक, दही याचा आहारात समावेश करावा. रुग्णाला थोडा-थोडा आहार देत राहायला हवे. ‘हिपॅटायटीस ए’ व ‘ई’च्या रुग्णांनी आजार असेपर्यंत स्वयंपाकगृहात जाऊ नये. आजार पसरण्याचा धोका असतो.

- उपचारच नाही हा गैरसमज

डॉ. समर्थ म्हणाले, कावीळवर उपचारच नाही हा एक गैरसमज आहे. आजाराच्या कारणांवर उपचार अवलंबून असतो. स्वयंघोषित डॉक्टर किंवा अप्रमाणित हर्बल औषधांना टाळायला हवे.

टॅग्स :Healthआरोग्य