शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक उच्च रक्तदाब दिन; चाळिशी गाठलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला ‘हायपर टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 07:00 IST

Nagpur News आज चाळिशी गाठलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने पीडित आहे. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञांनी केले आहे.

ठळक मुद्दे-योग्य जीवनशैली आत्मसात करा : हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला

सुमेध वाघमारे

नागपूर : उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन) हा आजार अपंगत्व आणि मृत्यूला सामोरे जाण्याचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. आज चाळिशी गाठलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती या आजाराने पीडित आहे. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञांनी केले आहे.

अयोग्य आहार, दूषित हवा, दूषित पाणी, स्वच्छतेची कमतरता, कुपोषित बाल व माता, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्जचे व्यसन, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा व ताण-तणाव आदी उच्च रक्तदाबाला जबाबदार घटक आहे. याला दूर ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवायला हव्यात. शिवाय, योग्य आहार, तणावावर नियंत्रण, नियमित व्यायाम व ड्रग्ज, तंबाखूचे सेवन बंद करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

- सर्वांत सामान्य लक्षणे

कोणतेही लक्षणे नसणे हेच उच्च रक्तदाबाचे सर्वांत सामान्य लक्षण आहे. उच्च रक्तदाब असलेले अनेकजण सामान्य पद्धतीने काम करीत राहतात. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर तीन महिन्यांतून एकदा रक्तदाब मोजणे आवश्यक आहे. रक्तदाब १४०/९० च्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. काहींमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धाप लागणे, अंधुक दिसणे ही लक्षणेसुद्धा दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये, नाकातून रक्त देखील येऊ शकते.

 

-घरी रक्तदाब तपासणे आवश्यक :डॉ. देशमुख 

फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, उच्च रक्तदाब लवकर ओळखण्यासाठी घरी रक्तदाब तपासणे हे प्रभावी साधन आहे. विशेषत: मधुमेह किंवा मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी हे महत्त्वाचे ठरते. घरी नियमित रक्तदाबाच्या तपासणीमुळे डॉक्टरांना औषधांचा योग्य डोस लिहून देणे सोपे जाते.

 

-तंबाखू, धूम्रपान सोडल्यास लाभ : डॉ. संचेती 

हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी रोज जास्तीत जास्त पाच ग्रॅम मिठाचे सेवन करावे. मिठाच्या सेवनावर नियंत्रण राहिल्यास हृदयाघात व ‘कोरोनरी हार्ट डिसिज’ला थांबविता येते. तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन पूर्णत: सोडल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

 

-अचूक रक्तदाब मोजणे गरजेचे : डॉ. हरकुट

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणारा ‘हायपर टेन्शन’ हा आजार जिवावरही बेतू शकतो. पन्नाशीनंतर प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हा आजार आहे. या आजाराचे तातडीने निदान व उपचार महत्त्वाचा ठरतो. विशेष म्हणजे, यात अचूक रक्तदाब मोजणे गरजेचे आहे. हा आजार इतर आजारांसारखा नाही. यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य