शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जागतिक दृष्टिदान दिन; अंधत्व रोखण्यात विदर्भ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 09:50 IST

आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्या पाचमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व अमरावती जिल्हा

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मोतीबिंदू हे अंधत्वाचे मुख्य कारण आहे. दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास ती साधारण ७२ टक्के आहे. मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्यासाठी सरकारने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे. तर पहिल्या पाचमध्ये गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व अमरावतीचा जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वात कमी लक्ष्य गाठणारा पालघर जिल्हा आहे.बुबुळासंबधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्टष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी व साहित्याचा पुरवठाही केला जातो. गेल्या वर्षात आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य पूर्ण करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेत प्रथम स्थान पटकाविले आहे. तर दुसºया स्थानावर १७७ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा गोंदिया जिल्ह्या, तिसºया स्थानावर १४८ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा नागपूर जिल्हा, चौथ्या स्थानावर १४६ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा चंद्रपूर जिल्हा तर पाचव्या स्थानावर १३६ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा अमरावती जिल्हा आहे. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्याने १२४ टक्के, अकोला जिल्ह्याने १२२ टक्के, लातुर जिल्ह्याने १७७ टक्के, बिड जिल्ह्याने ११३ टक्के तर मुंबईने १०९ टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे.आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्हे मिळून १६५६९९ लक्ष्य दिले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४२४५५ तर जिल्हा रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय व इतरही केंद्र मिळून ८९१०० असे एकूण १३१५५५ शस्त्रक्रिया केल्या. दिलेल्या लक्ष्याचा ७९ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यास यश आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य