शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

जागतिक पर्यावरण दिन; पृथ्वीला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही, ती आपली गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 08:30 IST

Nagpur News पृथ्वीला कोणाच्याही संरक्षणाची गरज नाही. ती स्वत:च पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत असते, अशी भावना ‘यूएनईपी’ची गुडविल ॲम्बेसेडर प्रख्यात अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त केली.

ठळक मुद्दे पर्यावरणाच्या क्षेत्रात भारताची भूमिका महत्त्वाची

मेहा शर्मा 

नागपूर : आपल्याकडे केवळ एकच पृथ्वी आहे आणि तिच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. पृथ्वीला कोणाच्याही संरक्षणाची गरज नाही. ती स्वत:च पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत असते, अशी भावना ‘यूएनईपी’ची गुडविल ॲम्बेसेडर प्रख्यात अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त केली. दिया भारतभरातील अनेक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय अभियानाचा प्रमुख चेहरा असून ती वन्यजीव संवर्धनासाठी कार्य करते. दिया युनायटेड नेशन्ससोबत ग्लोबल वाॅर्मिंग, वन्यजीव सुरक्षा, स्वच्छ वायू, स्वच्छ समुद्र आदी उपक्रमांशी जुळलेली आहे. त्याच अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला.

भारतीय संस्कृतीच मुळात निसर्गपूजक आहे आणि हजारो वर्षांपासून निसर्गाशी आपले नाते घनिष्ठ राहिलेले आहे. मात्र, गेल्या ५० वर्षांत आपण पश्चिमेकडील विकासाची व्याख्या आत्मसात करताना त्रिस्तरीय जगाच्या निर्मितीकडे वाटचाल करू लागलो. विकासाची ही शैली भारतीय विचारांना, विकासाच्या व्याख्येशी अनुरूप नाही. विकासाची श्रुंखला निर्माण करताना प्राचीन भारतीय ज्ञान जसे आयुर्वेद, वास्तुविज्ञान आणि पर्यावरणाकडे बघण्याची जिज्ञासा पुन्हा आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने चिपको मूव्हमेंट, ग्रासरूट पिपरसारख्या महत्त्वाच्या चळवळी उभ्या राहिल्या आहेत. जगातील भूभागापैकी २.३ टक्के जागा भारताने व्यापली आहे आणि या लहानशा भूभागावर जगातील दुसरी मोठी लोकसंख्या वास्तव्य करते. त्यामुळे, निसर्गाशी ताळमेळ साधणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त हिरवळ कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

उत्तर गोलार्धातील देशांची ऊर्जेची लालसा आज दक्षिण गोलार्धातील देशांना भोगावी लागत आहे. या संकटापासून दूर नेण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे आणि ते ज्ञानही आपल्याकडे आहे. ऊर्जेच्या बाबतीत अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देणे ही काळाची गरज आहे. जैविक इंधनाचा वापर कमी करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. त्याअनुषंगाने या उपाययोजनांकडे निधी वळवणे महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी इतर देशांवर दबाव आणणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने आपल्या पंतप्रधानांनी यूएनईएमध्ये केलेली सौरऊर्जा निर्मितीवर भर देण्याची घोषणा अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिया मिर्झा म्हणाली. याबाबत जनजागरण विश्वस्तरावर होणे गरजेचे आहे. ‘एक पृथ्वी’ हे यंदाचे घोषवाक्य आहे आणि हे घोषवाक्य आपल्या एका घराच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. आपण पृथ्वीशिवाय कुठेही जगू शकत नाही. ही बाब जागतिक नेत्यांनी समजणे, समजावणे आणि कृतीत आणणे गरजेचे असल्याचे दिया म्हणाली.

पर्यावरणाबाबत चित्रपट उद्योगही संवेदनशील

चित्रपट उद्योगातही पर्यावरणाच्या बाबतीत बरेच परिवर्तन दिसून येत आहे. या क्षेत्राने पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ आपल्या दैनंदिन जीवनातही दिसून येत असल्याचे दिया मिर्झा म्हणाली.

..............

टॅग्स :environmentपर्यावरण