शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

विश्व पर्यावरण दिन विशेष; एकच पृथ्वी आहे, पर्यावरण नष्ट झाले तर जाणार कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 08:00 IST

Nagpur News हवामान बदल व तापमान वाढीची समस्या या पृथ्वीला मंगळ ग्रहासारखे वाळवंट बनविण्याकडे ढकलत आहे. मात्र मानवाने विचार करावा, एकच पृथ्वी आहे आणि तीच जर नष्ट झाली तर जाणार कुठे?

ठळक मुद्देयंदा विदर्भातील पाच शहरे हाेती जगात उष्ण

 

निशांत वानखेडे

नागपूर : संपूर्ण अंतराळात, तारामंडळात पर्यावरण, सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी आहे. सध्यातरी सजीवसृष्टीला अनुकूल असलेला दुसरा ग्रह वैज्ञानिकांना सापडला नाही. त्यामुळे मानवाचे अस्तित्वही पृथ्वीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. मात्र मानवाने आपल्याच धरणीवरील जल, जंगल, जमिनीचे ज्या पद्धतीने शाेषण चालविले आहे, त्यावरून भविष्यात या ग्रहावर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. प्रचंड वाढलेले प्रदूषण, नष्ट हाेत चाललेले वनक्षेत्र, त्यामुळे निर्माण झालेली हवामान बदल व तापमान वाढीची समस्या या पृथ्वीला मंगळ ग्रहासारखे वाळवंट बनविण्याकडे ढकलत आहे. मात्र मानवाने विचार करावा, एकच पृथ्वी आहे आणि तीच जर नष्ट झाली तर जाणार कुठे?

२०५० पर्यंत ५० डिग्रीवर पारा गेला तर काय हाेईल?

 विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी यावर्षी उन्हाळ्याच्या झळा साेसल्या आहेत. कधी नव्हे ते यावेळी मुंबई, पुणे, काेकणातील लाेकांना उन्हाचे चटके बसले. एवढेच नाही तर जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील पाच शहरांचा समावेश हाेता. यावरून तापमान वाढीचा अंदाज यायला लागला आहे. वैज्ञानिकांनी आधीच जागतिक तापमान २०५०पर्यंत ३ अंशाने वाढण्याचा इशारा दिला आहे. विदर्भातील परिस्थितीनुसार तापमान ५० अंशावर गेले तर माणसाचे जगणेच कठीण हाेऊन जाईल.

ग्लाेबल वाॅर्मिंगचा धाेका लक्षात घेता जागतिक तापमानवाढ २०५०पर्यंत १.५ अंशावर राेखण्याची शपथ घेण्यात आली हाेती. मात्र, त्यात सर्वच देश अपयशी ठरले आहेत. इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज (आयपीसीसी)ने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, दीड अंशाची मर्यादा पार केली असून, २०३०पर्यंत तापमान २ अंशाने आणि २०५०पर्यंत ३ अंशापर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. याचा अर्थ वेगाने वाढणारे हरित वायूचे प्रदूषण, काेळशावर आधारित ऊर्जा निर्मिती कमी करण्यात आपण अपयशी ठरलाे आहाेत.

विदर्भाचा विचार केल्यास औष्णिक वीज केंद्र ही प्रदूषणवाढीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरली आहेत. त्यातून उत्सर्जित हाेणारे सल्फर, नायट्राेजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान करणारे आहेत. त्यापाठाेपाठ वाहने आणि धुलीकणांचे वाढलेले प्रदूषण धाेक्यात भर घालत आहेत. कार्बन उत्सर्जन ४२५च्या पुढे गेले आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात १७ दिवस आणि मे महिन्यात तब्बल २१ दिवस प्रदूषित हाेते. या प्रदूषणाचा थेट परिणाम तापमान वाढीवर हाेत आहे.

२००० सालापासून २० वर्षांत विदर्भाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. केवळ १० वर्षांत तापमानात २ अंशाची वाढ झाली. यावर्षीही गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी मान्सूनी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आधीच ४७ अंशापर्यंत गेलेले तापमान २०५०पर्यंत ५० अंशापर्यंत वाढणे निश्चित आहे. असे झाले तर त्याचे दुष्परिणाम भयावह असतील. जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढेल, ज्वलनशील पदार्थांच्या उद्याेगात आगी लागतील, तीव्र तापमानामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढेल, ढगफुटी, महापुराचे संकट ओढवेल, शेती नष्ट हाेईल, राेगराई वाढेल आणि जनजीवन विस्कळीत हाेऊन अर्थव्यवस्था धाेक्यात येईल, अशी भीती आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण