शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

जागतिक वसुंधरा दिन; नागपूरचा पारा का तापतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 09:55 IST

उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतो. या सर्वांचे कारण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत वसुंधरेकडे झालेले दुर्लक्ष आहे. त्याचे परिणाम निव्वळ मानवालाच नाही, तर संपूर्ण इको सिस्टिमला जाणवत आहे.

ठळक मुद्देवसुंधरेच्या अस्तित्वालाच धोका!विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरण संवर्धनाकडेच दुर्लक्षइको सिस्टीमलाही बसतोय फटकानिव्वळ भिंती रंगवून, जनजागृती करून साध्य काय होणार?प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धन व्हायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमान पूर्वीही ४५, ४८ पर्यत जायचे. पण त्याची झळ बसत नव्हती. आता तापमान ४० वर गेले की, प्रचंड उकाडा जाणवतो. अंग भाजणाऱ्या उन्हामुळे सकाळी ९ वाजतापासून बाहेर पडणे कठीण झाले आहे. कूलर, एसीशिवाय घरात राहणे शक्य नाही. उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतो. या सर्वांचे कारण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत वसुंधरेकडे झालेले दुर्लक्ष आहे. त्याचे परिणाम निव्वळ मानवालाच नाही, तर संपूर्ण इको सिस्टिमला जाणवत आहे.कधीकाळी शहरातील तलाव हे नागपूरचे वैभव होते. पिण्याच्या पाण्याबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळी तलावामुळे वाढत होती. तेव्हा विहिरींना २०, २५ फुटांवर पाणी लागायचे. तलावातील जलचर सुरक्षित होते. आता दरवर्षी उन्हाळ्यात तलावातील जलचर मरतात. कारण तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे. तलावांना गटारलाईन जोडल्या आहे. जलकुंभीमुळे लेंडी तलावाचे अस्तित्व हिरावले आहे. नाईक तलाव धोक्यात आहे. तलावाच्या सभोवताली करण्यात आलेल्या सिमेंटीकरणामुळे दरवर्षी तलाव कोरडे पडत आहे. विसर्जनाचा सोहळा हा तलावांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तलावांच्या या दुरवस्थेमुळे तलावातील जलचरच नाही तर, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.शहराचा विकास झपाट्याने होत आहे आणि त्यासाठी या वसुंधरेचे संवर्धन करणारी वृक्ष धडाक्याने कापली जात आहे. प्रत्येक वृक्षाची एक इकोसिस्टम असते. ज्यात अनेक प्रकारच्या जीवजंतूचे अस्तित्व वृक्षामुळे टिकलेले असते. पण शहराच्या विस्तारात, प्रगतीत वृक्षाची छटाई ही वसुंधरेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी आहे.वृक्षगणनेतून वास्तव कळेलदर पाच वर्षानी वृक्षगणना केली जाते. पण गेल्या नऊ वर्षांपासून नागपुरात वृक्षगणना झाली नाही. मात्र गेल्या तीन ते चार वर्षात वृक्ष लागवडीचे अनेक अभियान राबविण्यात आले. हे अभियान किती यशस्वी झाले हे वास्तव वृक्षगणनेतून पुढे येईल. आज रस्त्याच्या दुतर्फा असलेली वृक्ष कापली जात आहे आणि डिव्हायडरच्या मध्ये वृक्ष लावली जात आहे. पण हे वृक्ष शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालत आहे. पर्यावरणाला त्याचा कुठलाच फायदा नाही.अर्थ डे नेटवर्क १९७० पासून वसुंधरा दिवस साजरा करते. यावर्षी अर्थ डेची थिम ‘प्रोटेक्ट अवर स्पिसिज’ आहे. पण आज कोरडे पडलेले तलाव, मोबाईल टॉवरचे रेडिएशन, काँक्रिटचे जंगल, सिमेंट रोड, थर्मल पॉवर स्टेशनचे प्रदूषण, त्यामुळे वाढते तापमान यामुळे वसुंधरेतील प्रजातीच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरत आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडून नष्ट होत असलेल्या प्रजातीचे संरक्षण करणे गरजेचे आहे.सिमेंट रोडमुळे वाढले तापमानउन्हाळा जाणविण्याचे मुख्य कारण सिमेंट रोड ठरत आहे. कारण सिमेंट रोडमुळे शहरात पडणारे पाणी जमिनीत न मुरता, नाल्यांच्या माध्यमातून शहराबाहेर वाहून जात आहे. त्यामुळे शहरातील वस्त्यांमध्ये ग्राऊंड वॉटर लेव्हल कमी झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आग्रह करण्यात येतो. पण शहरात पावसाचे पाणी वाहून जात असेल तर त्यावर विचार करणे गरजेचे आहे.

पक्षी झाले कमीइंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कचे जाळे शहरात इतके प्रचंड वाढले आहे की त्याचा फटका पक्ष्यांना बसतो आहे. शहरातून पक्ष्यांच्या अनेक जाती नामशेष होताना दिसत आहे. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा मोठा फटका पक्ष्यांना बसतो आहे. सोबतच काँक्रिटच्या जंगलामुळे पक्षी कमी झाले आहे.

ऑक्सिजन हॉटस्पॉट सुरक्षित ठेवण्याची गरजकधीकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर वृक्षांच्या रांगा असायच्या. आज रस्त्याच्या विस्तारीकरणात मुख्य रस्ते ओसाड पडले आहे. त्यामुळे आज शहरातील महाराजबाग, मेडिकल, सेमिनरी हिल्स, नीरी, मध्यवर्ती कारागृहाचा परिसर हे ऑक्सिजन हॉटस्पॉट ठरत आहे. शहरातील हा ग्रीनबेल्टसुद्धा विकासाच्या प्रक्रियेत नष्ट होत आहे. -

सुरभी जैस्वाल,समन्वयक, अर्थ डे नेटवर्क

टॅग्स :Earthपृथ्वी