शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

जागतिक ग्राहक दिन! शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 10:06 IST

१५ मार्च रोजी जागतिक ग्राहकदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकमतने विशेषज्ञांशी चर्चा केली. या चर्चेत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीवर भर दिला. शेतकऱ्यांसाठी शेतकरी हमी योजना राबविली गेली पाहिजे, याकडेही या विशेषज्ञांनी लक्ष वेधले.

ठळक मुद्दे हमी योजना प्राधान्याने राबवावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज देशातील ग्राहक जागृत झाला आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती नाही. अशा ग्राहकांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती देण्यासाठी अनेक संस्था कार्य करीत असतात. याच क्रमात १५ मार्च रोजी जागतिक ग्राहकदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकमतने विशेषज्ञांशी चर्चा केली. या चर्चेत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीवर भर दिला. शेतकऱ्यांसाठी शेतकरी हमी योजना राबविली गेली पाहिजे, याकडेही या विशेषज्ञांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सध्या जे आंदोलन सुरू आहे ते लाभदायक ठरतील. ग्रामीण भागात केवळ रस्ते बनविल्याने विकास होणार नाही. लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, असेही या विशेषज्ञांनी सांगितले.

ग्राहक चिंतित आहेआज आॅनलाईन खरेदी वाढली आहे. परंतु या तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच ग्राहकांची लूटही वाढली आहे. चार नवीन कायदे आल्याने ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. आरोग्य सुविधांच्या नावावरही लूटमार सुरू आहे. शेतकऱ्यांना त्यांचे लागवडमूल्यही मिळत नाही. रेशनिंग व्यवस्थाही ठप्प आहे.- देवेंद्र तिवारीराष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद

वर्षभर साजरा व्हावा ग्राहकदिनग्राहकदिन केवळ एक दिवस नाही तर वर्षभर साजरा व्हायला हवा. पेट्रोल-डिझेल तथा पेट्रोलियम उत्पादन जीएसटीच्या मर्यादेत आले पाहिजे. यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या उत्पादनांवर जीएसटी लागला तर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील. जीएसटीमुळे पारदर्शकता आली आहे. ग्राहकांना याचा फायदा होतोय. काही गोष्टींचा परिणाम दिसायला वेळ लागतो, पण त्याच लाभ होतोच.- गजानन पांडे, विदर्भ प्रांत अध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत ग्राहक

राजा असतो हे खोटेग्राहक बाजाराचा राजा असतो असे सांगितले जाते, पण वास्तविकता तशी नसते. आज अधिकारी सेवेच्या मूडमध्ये नाहीत. शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत बाजारात अशीच लुटमार राहील. शेतकरी मेहनत करतो. त्याला त्याचे फळ मिळाले पाहिजे. जीएसटी लागू व्हायच्या आधी जे दर होते आजही तेच आहेत. यात काहीच बदलले नाही.- अ‍ॅड. जे.सी. शुक्ला

ग्राहकांची स्थिती योग्य नाहीअधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या हिताशी काही घेणे-देणे नाही. अनेकदा नियम न वाचताच सर्क्युलर जारी केले जाते. विजेच्या क्षेत्रात तर ग्राहकांचे हक्क डावलले जात आहेत. काही अधिकारी तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अवहेलना करतात. योजनांचा लाभही उपभोक्त्यांना मिळत नाही. त्यांच्या अज्ञानतेचा गैरफायदा उचलला जातो.- अ‍ॅड. नरेश बन्सोड, कन्झ्युमर कोर्ट एमएसईबी

कुठले धोरणच नाहीदेशात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणच नाही. एक उत्पादन एक किमतीचा दावा करणाऱ्या जीएसटीच्या काळात एकाच उत्पादनाची वेगवेगळी किंमत वसूल केली जात आहे. बेकरी उत्पादनांवर बेस्ट बीफोर लिहिले जाते. जेव्हा की त्यावर एक्सपायरी डेट असली पाहिजे. बेकरी उत्पादनांमध्ये पोटॅशियम ग्रेनेडचाा सर्रास वापर केला जात आहे. परिणामी लोकांमध्ये थायराईडच्या तक्रारी वाढत आहेत. देशात सेंट्रल फूड अ‍ॅथॉरिटी असली पाहिजे. २६ हजार कोटींचा आॅनलाईन व्यापार आहे. परंतु धोरणच नसल्याने ग्राहकांची लूट सुरू आहे.- शाहिद शरीफसंस्थापक अध्यक्ष अ‍ॅन्टीएडल्ट्रेशन कन्झ्युमर सोसायटी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत