शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मधमाशी संवर्धन दिन; मधमाशा अभ्यासातून मधनिर्मिती व्यवसायाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 07:00 IST

Nagpur News एका मोठ्या आयटी कंपनीची नोकरी सोडून मधमाशा पालनाच्या व्यवसायात भरारी घेतलेल्या अभियंता प्रणव निंबाळकरांचा हा प्रवास थक्क करणारा आहे पण त्यांच्या मते हा निसर्गाकडे घेऊन जाणारा समाधानकारक प्रवास आहे.

ठळक मुद्देप्रणव निंबाळकरांचा निसर्गाकडे जाणारा प्रवास सोडली कंपनीची नोकरी

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मधमाशांबद्दलचे कुतूहल मनात असताना त्यांची संख्या कमी होत असल्याची खंतही त्यांना होती. या कुतूहलामुळे त्यांना मधमाशांच्या अभ्यासाकडे वळविले. हा अभ्यास करताना मधमाशांच्या संवर्धनाचे पाऊल त्यांनी उचलले आणि पुढे हाच त्यांचा व्यवसाय झाला. एका मोठ्या आयटी कंपनीची नोकरी सोडून मधमाशा पालनाच्या व्यवसायात भरारी घेतलेल्या अभियंता प्रणव निंबाळकरांचा हा प्रवास थक्क करणारा आहे पण त्यांच्या मते हा निसर्गाकडे घेऊन जाणारा समाधानकारक प्रवास आहे.

मधमाशांचे अस्तित्व आज संकटात आले आहे. असे चित्र असताना निसर्गाबद्दल आपुलकी असलेली काही माणसे प्रत्येक गोष्टीच्या संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. नागपूरचे प्रणव निंबाळकर हे तसेच एक व्यक्तिमत्त्व. प्रणव एक अभियंता आहेत आणि आयटी कंपन्यात त्यांनी ११ वर्ष सेवा दिली आहे. निसर्गाबद्दल नितांत आदर असलेल्या ‘अजनीवन बचाव’ मोहिमेत सक्रिय सहभाग होता. त्यांनीच या भागातील मधमाशांविषयी अभ्यास केला होता. इंटरनेटवरून मधमाशांविषयी अभ्यास करताना मधनिर्मितीच्या व्यवसायाची कल्पना आली. नोकरी करीत असताना मधमाशा पालनाचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाविषयी माहिती नसल्याने वाईट अनुभवही आले. मात्र जिद्द सोडली नाही. पुढे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. मधमाशांच्या २०० पेट्या घेतल्या. नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष याकडे दिले. मधमाशा वाढत गेल्या आणि आज त्यांच्याकडे १००० झाल्या आहेत. मधमाशांच्या माध्यमातून निसर्गाविषयी असलेल्या प्रेमामुळे यश मिळाल्याचे ते सांगतात.

फुलांसाठी देशभर स्थलांतर

प्रणव यांनी देशात वेगवेगळ्या भागात काेणत्या वेळी काेणते पीक हाेते आणि त्यात मधमाशांसाठी काेणते पीक चांगले याचाही अभ्यास केला. हवामानाचाही अभ्यास करावा लागला. झाडांवर किंवा पिकांवर फुलांचा बहर १५-२० दिवस किंवा महिना-दीड महिना असताे. माेहरी, काेथींबिर, सूर्यफूल असे पिक असलेल्या भागात पेट्या घेऊन सातत्याने स्थलांतर करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मधमाशा घटणे हे पर्यावरणावरचे संकट

शहरातच नाही तर ग्रामीण भागातही मधमाशांची संख्या वेगाने कमी झाली आहे. माेठ्या झाडांवर दिसणारे मधमाशांचे पाेळे आता दिसेनासे झाले आहेत. जंगलातही ते कमी झाले आहे. फूलझाडे व फळझाडांच्या परागीकरणात व त्यातून पिकांचे उत्पादन वाढविण्यात मधमाशांचे महत्त्व अधिक आहे. डाळींबाचे परागीकरण तर मधमाशांवरच अवलंबून आहे. त्यामुळे मधमाशा कमी झाल्याने पिकांच्या उत्पादनासह पर्यावरणावर माेठे संकट आहे.

हायब्रीड पिकांमुळेही मधमाशा कमी

मधमाशा कमी हाेण्यामागे अमर्याद वृक्षताेड, पिकांवर पेस्टीसाईडची फवारणी आणि हायब्रीड पिकांची प्रचंड वाढ हे माेठे कारण आहे. मधमाशांना आवडणाऱ्या निलगिरी, सूर्यफुलांमध्ये छान मध असते पण हायब्रीड पिकांच्या फुलांमध्ये मध कमी येते किंवा मिळतही नाही. शिवाय रासायनिक फवारणीमुळे मधमाशा मरत आहेत. त्यामुळे हायब्रीड ऐवजी देसी पिकांची लागवड करण्यासाठी माेहीम राबविणार असल्याचे प्रणव यांनी सांगितले.

संवर्धनासाठी ही झाडे महत्त्वाची

- प्रणव यांच्या मते मधमाशांचे संवर्धन करणे ही माणसाची गरज आहे. मधमाशांना आकर्षित करणारी वड, पिंपळासारख्या माेठ्या झाडांची लागवड. - जांभूळ, कढीपत्ता, काटेसावर, सिसम, बाेर, पेरू, लिंबू, संत्रे, माेसंबी, बाभुळ, खेर, वाळवंटातील शमी, निलगिरी अशा झाडांची लागवड करावी.

- उद्यानात लाजवंतीसारखी झाडे लावावी. पेस्टीसाईडची फवारणी बागेत टाळावी.

- इमारतींवर लागलेली मधमाशांची पाेळे रासायनिक स्प्रे मारून काढू नयेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीव