शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मधमाशी संवर्धन दिन; मधमाशा अभ्यासातून मधनिर्मिती व्यवसायाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 07:00 IST

Nagpur News एका मोठ्या आयटी कंपनीची नोकरी सोडून मधमाशा पालनाच्या व्यवसायात भरारी घेतलेल्या अभियंता प्रणव निंबाळकरांचा हा प्रवास थक्क करणारा आहे पण त्यांच्या मते हा निसर्गाकडे घेऊन जाणारा समाधानकारक प्रवास आहे.

ठळक मुद्देप्रणव निंबाळकरांचा निसर्गाकडे जाणारा प्रवास सोडली कंपनीची नोकरी

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मधमाशांबद्दलचे कुतूहल मनात असताना त्यांची संख्या कमी होत असल्याची खंतही त्यांना होती. या कुतूहलामुळे त्यांना मधमाशांच्या अभ्यासाकडे वळविले. हा अभ्यास करताना मधमाशांच्या संवर्धनाचे पाऊल त्यांनी उचलले आणि पुढे हाच त्यांचा व्यवसाय झाला. एका मोठ्या आयटी कंपनीची नोकरी सोडून मधमाशा पालनाच्या व्यवसायात भरारी घेतलेल्या अभियंता प्रणव निंबाळकरांचा हा प्रवास थक्क करणारा आहे पण त्यांच्या मते हा निसर्गाकडे घेऊन जाणारा समाधानकारक प्रवास आहे.

मधमाशांचे अस्तित्व आज संकटात आले आहे. असे चित्र असताना निसर्गाबद्दल आपुलकी असलेली काही माणसे प्रत्येक गोष्टीच्या संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. नागपूरचे प्रणव निंबाळकर हे तसेच एक व्यक्तिमत्त्व. प्रणव एक अभियंता आहेत आणि आयटी कंपन्यात त्यांनी ११ वर्ष सेवा दिली आहे. निसर्गाबद्दल नितांत आदर असलेल्या ‘अजनीवन बचाव’ मोहिमेत सक्रिय सहभाग होता. त्यांनीच या भागातील मधमाशांविषयी अभ्यास केला होता. इंटरनेटवरून मधमाशांविषयी अभ्यास करताना मधनिर्मितीच्या व्यवसायाची कल्पना आली. नोकरी करीत असताना मधमाशा पालनाचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाविषयी माहिती नसल्याने वाईट अनुभवही आले. मात्र जिद्द सोडली नाही. पुढे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला. मधमाशांच्या २०० पेट्या घेतल्या. नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष याकडे दिले. मधमाशा वाढत गेल्या आणि आज त्यांच्याकडे १००० झाल्या आहेत. मधमाशांच्या माध्यमातून निसर्गाविषयी असलेल्या प्रेमामुळे यश मिळाल्याचे ते सांगतात.

फुलांसाठी देशभर स्थलांतर

प्रणव यांनी देशात वेगवेगळ्या भागात काेणत्या वेळी काेणते पीक हाेते आणि त्यात मधमाशांसाठी काेणते पीक चांगले याचाही अभ्यास केला. हवामानाचाही अभ्यास करावा लागला. झाडांवर किंवा पिकांवर फुलांचा बहर १५-२० दिवस किंवा महिना-दीड महिना असताे. माेहरी, काेथींबिर, सूर्यफूल असे पिक असलेल्या भागात पेट्या घेऊन सातत्याने स्थलांतर करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मधमाशा घटणे हे पर्यावरणावरचे संकट

शहरातच नाही तर ग्रामीण भागातही मधमाशांची संख्या वेगाने कमी झाली आहे. माेठ्या झाडांवर दिसणारे मधमाशांचे पाेळे आता दिसेनासे झाले आहेत. जंगलातही ते कमी झाले आहे. फूलझाडे व फळझाडांच्या परागीकरणात व त्यातून पिकांचे उत्पादन वाढविण्यात मधमाशांचे महत्त्व अधिक आहे. डाळींबाचे परागीकरण तर मधमाशांवरच अवलंबून आहे. त्यामुळे मधमाशा कमी झाल्याने पिकांच्या उत्पादनासह पर्यावरणावर माेठे संकट आहे.

हायब्रीड पिकांमुळेही मधमाशा कमी

मधमाशा कमी हाेण्यामागे अमर्याद वृक्षताेड, पिकांवर पेस्टीसाईडची फवारणी आणि हायब्रीड पिकांची प्रचंड वाढ हे माेठे कारण आहे. मधमाशांना आवडणाऱ्या निलगिरी, सूर्यफुलांमध्ये छान मध असते पण हायब्रीड पिकांच्या फुलांमध्ये मध कमी येते किंवा मिळतही नाही. शिवाय रासायनिक फवारणीमुळे मधमाशा मरत आहेत. त्यामुळे हायब्रीड ऐवजी देसी पिकांची लागवड करण्यासाठी माेहीम राबविणार असल्याचे प्रणव यांनी सांगितले.

संवर्धनासाठी ही झाडे महत्त्वाची

- प्रणव यांच्या मते मधमाशांचे संवर्धन करणे ही माणसाची गरज आहे. मधमाशांना आकर्षित करणारी वड, पिंपळासारख्या माेठ्या झाडांची लागवड. - जांभूळ, कढीपत्ता, काटेसावर, सिसम, बाेर, पेरू, लिंबू, संत्रे, माेसंबी, बाभुळ, खेर, वाळवंटातील शमी, निलगिरी अशा झाडांची लागवड करावी.

- उद्यानात लाजवंतीसारखी झाडे लावावी. पेस्टीसाईडची फवारणी बागेत टाळावी.

- इमारतींवर लागलेली मधमाशांची पाेळे रासायनिक स्प्रे मारून काढू नयेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीव