शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामीण भागातील जनसुविधा याेजनेची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुही : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने ग्रामीण भागात ग्रामपंचायतस्तरावरील जनसुविधा योजनेअंतर्गत ३० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुही : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने ग्रामीण भागात ग्रामपंचायतस्तरावरील जनसुविधा योजनेअंतर्गत ३० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांचेकडे महिनाभरापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे काम रखडली असून, ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसत असल्याने नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेत आहे.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी काेराेना संक्रमण कमी हाेताच २२ जानेवारी राेजी जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेतली हाेती. या बैठकीत जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेअंतर्गत पाठविलेल्या प्रस्तावाला लागणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने ३० कोटी रुपयांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पाठविले असले तरी, मार्च महिना संपायला अवघे १५ दिवस उरले असताना या प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे याबाबत सरपंच, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे विचारणा करीत आहेत.

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून अद्याप मंजुरी अप्राप्त असल्याचे पंचायत विभागाकडून संबंधितांना उत्तर दिल्या जाते. जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन संबधित प्रस्तावांना मंजुरी मिळवून आणण्याचे कुणीही धाडस दाखवित नाही. जनसुविधा योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून संबंधित ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी, नाली, रस्ते, ग्रामीण विकासाला चालना देणारे आदी कामे प्रस्तावित केली आहेत. मार्चमध्ये ही कामे पूर्ण व्हायला हवी होती. परंतु, निधी असूनही मंजुरीअभावी ही कामे रखडलेली आहेत. त्यामुळे याला मंजुरी देण्याची मागणी राहुल हरडे यांच्यासह सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.