शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
4
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
5
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
6
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
7
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
8
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
9
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
10
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
11
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
12
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
13
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
14
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
15
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
16
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
17
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
18
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
19
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
20
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले

टेंडर न काढताच दिले जात आहे ७८.६४ कोटींचे काम; नागपूर मनपाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:01 IST

नागपूर मनपातील सत्ताधारी भाजप सरकारने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अडीच दशकासाठी खासगी हाातात सोपवले. आता परिस्थती अशी आहे की, करार होऊन ९ वर्षे उलटल्यानंतरही शहरातील एक तृतीयांश नागरिकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही.

ठळक मुद्देपाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या नावावर लुटमार

लोकमत न्यूज नेटवर्कराजीव सिंहनागपूर : प्रत्येक घराला २४ तास पाणीपुरवठा होईल, असे स्वप्न दाखवून मनपातील सत्ताधारी भाजप सरकारने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अडीच दशकासाठी खासगी हाातात सोपवले. आता परिस्थती अशी आहे की, करार होऊन ९ वर्षे उलटल्यानंतरही शहरातील एक तृतीयांश नागरिकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. मंद कार्यप्रणालीनंतरही पाणीपुरवठा कंपनी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) ला नागपूर महापालिका तब्बल ७८ कोटी ६४ लाख ९५ हजार रुपयाचे अतिरिक्त काम देत आहे.

यासंदर्भात मनपा व ओसीडब्ल्यू दरम्यान मध्यस्थाची भूमिका निभावण्यासाठी बनवण्यात आलेली कंपनी नागपूर एन्वायरमेंटल सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएसएल) तर्फे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या निदेर्शानुसार २१ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र जारी करीत अतिरिक्त काम करण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागविण्यात आले आहे. संबंधित काम निविदा न काढता कराराच्या आधारावर थेट अतिरिक्त काम ओसीडब्ल्यूला देण्याची योजना असल्याचे सांगितले जाते.एनईएसएलमध्ये महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक आहेत. यानंतरही निविदा न काढता काम देण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शविणे अनेक प्रश्न निर्माण करते. नागपुरात २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी ओसीडब्ल्यूसोबत मनपाने ३ जून २०११ रोजी करार केला. २५ वर्षांसाठी हा करार झालेला आहे. १ मार्च २०१२ रोजी आॅपरेटरने प्रकल्प आपल्या हाती घेतला. पाईपलाईन बदलणे, वॉल्व लावणे, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदी कामांसाठी ५ वर्षाचा करार झाला. परंतु काम निश्चित कालावधीत पूर्ण न झाल्यामुळे कंपनीला मुदतवाढ मिळाली. माजी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना इशारा देत २०१९ पर्यंत काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. नंतर त्यांची बदली झाली. परंतु काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मार्च २०२२ पर्यंतची मुदतवाढ पुन्हा मिळालेली आहे. मुदतवाढीसोबतच कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त काम देऊन नागरिकांचे पैसे लुटवण्याचे काम सत्तारुढ भाजप करीत आहे.अतिरिक्त काम देण्याचा कुठलाही निर्णय नाहीमनपाच्या अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) श्वेता बॅनजीर्ने सांगितले की, ओसीडब्ल्यूसोबत २५ वर्षार्साठी करार झालेला आहे. अतिरिक्त काम देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत त्यांनी पाईपलाईन बदलवण्याचे काम पूर्ण केलेले आहे.

एक तृतीयांश ग्राहकांनाही पुरेसे पाणी नाही- २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना म्हणजे शहरवासीयांना २४ तास पाणी उपलब्ध करण्याची योजना होय. पाच वर्षात यावर अंमलबजावणी होणार होती. परंतु आतापर्यंत एक तृतीयाांश नागरिकांनाही पुरेसे पाणी पोहचवू शकले नाही.

टॅग्स :Waterपाणी