शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:04 IST

शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्यां सामान्यांना बसत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसोबतच सामान्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्या सामान्यांना बसत आहे.कामठी रोडवरील अन्न पुरवठा विभागाच्या गोदामात २००८ पासून नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय अडकून पडले आहे. केवळ आठ हजार चौरस फुटाच्या जागेवर जिल्हासह नागपूर विभागाचा डोलारा हे कार्यालय सांभाळत आहे. परंतु येथे सोयीच्या नावाने चार भिंती आणि डोक्यावर टिनाचे छप्पर एवढेच आहे. येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामानिमित्त येणाऱ्याना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कार्यालयात पाण्याची विशेष सोय नाही. प्रसाधन गृहाचा अभाव आहे. येथील कर्मचारी परिसरातील ओळखीच्या घरातील प्रसाधन गृहाचा वापर करतात. महिला कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते तर येथे येणारे वाहनधारक मैदानाचा आश्रय घेतात. कार्यालयात पार्किंगची सोय नाही. अवैध पार्किंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. स्वत:ची जागा नसल्याने कार्यालयाच्या चार भिंती सोडल्यास संपूर्ण परिसरात हातठेल्यांपासून ते ‘ऑनलाईन’ केंद्राचे अतिक्रमण आहे. अतिक्रमण एवढे की जिथे अर्जदारांची रांग लागते तिथेच दलालांचे टेबलही लागतात. कार्यालयाच्या आत तर भयाण चित्र आहे. कोंबड्याच्या खुराड्यासारख्या जागेत डोक्यापासून चार ते पाच फुटावर असलेल्या टिनाचा शेडखाली कार्यालयाचे कामकाज चालते.डोक्याला रुमाल बांधून करावे लागते काम 

कार्यालय प्रशासनाने पंखे व कुलरची सोय केली असलीतरी त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे व ते कुचकामी ठरल्याचे येथील कर्मचारी सांगतात. डोक्याला रुमाल बांधूनच काम करावे लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सततच्या घामामुळे व उष्ण हवेमुळे आरोग्य धोक्यात आल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.चार वर्षे होऊनही बांधकाम अपूर्णचआरटीओ कार्यालयाला ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील पाच एकरची जागा मिळाली. १४ कोटींचा निधीही मंजूर झाला. २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण होणार होते. परंतु आता चार वर्षांचा कालावधी होऊनही बांधकाम पूर्ण झालेले नाही.उन्हात लागते रांग 
कार्यालयातील विविध खिडकींवर उभे राहण्यासाठी टिनाचे शेड टाकण्यात आले आहे. परंतु या शेडखाली दलालांचे टेबल लागत असल्याने कार्यालयात येणाऱ्यांना उन्हात उभे रहावे लागते तर, कर्मचाऱ्यांना तापत्या टिनाच्या शेडखाली घाम पुसत अर्जदारांचे काम करावे लागते.आणखी एक महिन्याचा कालावधीनागपूर ग्रामीण आरटीओचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काही छोटेमोठे काम शिल्लक आहे. यामुळे नव्या इमारतीतून कार्यालयाचे कामकाज सुरू व्हायला आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर